Mumbai Tak /बातम्या / महाराष्ट्रातली पर्यटनस्थळं पुन्हा सुरू होणार, ठाकरे सरकारने आणली नवी नियमावली
बातम्या

महाराष्ट्रातली पर्यटनस्थळं पुन्हा सुरू होणार, ठाकरे सरकारने आणली नवी नियमावली

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तिसरी लाट ओसरली आहे. राज्यातला कोरोना संसर्ग आता कमी झाला आहे. संसर्ग नियंत्रणात असल्याची माहिती टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून 1 फेब्रुवारी 2022 पासून सगळी पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमावलीनुसार राष्ट्रीय उद्यानं, सफारी, सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळे यासाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची संमती देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारांसाठीच्या 20 व्यक्तींची मर्यादा हटवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

काय आहे राज्य सरकारची नवी नियमावली?

सर्व पर्यटनस्थळं नियमित वेळेवर सुरू होतील, ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसंच फिरायला जाणाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं आवश्यक

स्पा, ब्युटी पार्लर, सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती

अंत्ययात्रेत उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आलेल्या नाहीत

उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्रशासनाने केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने

नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे निर्धारित वेळेवर सुरू होती. पर्यटकांनी मास्क लावणं आणि लसीचे दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक

अम्युझमेंट पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मुभा

सोमवारी राज्यात 15 हजार 140 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे 35 हजार 453 रूग्ण होऊन बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 73 लाख 67 हजार 259 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 2 लाख 7 हजार 350 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे. तर मृत्यूदर 1.85 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 नमुन्यांपैकी 10.35 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − five =

PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…