हरियाणा निवडणुकीचा महाराष्ट्र निवडणुकीवर परिणाम?

मुंबई तक

हरियाणाच्या निवडणुकीत भाजपचा विजय महाराष्ट्र निवडणुकीतील भविष्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव पाडणार का? आगामी निवडणुकीत ओबीसी, दलित मतदार कोणाला समर्थन करतील, या बाबत सध्या चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

google news

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्याने कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. भाजपने ९० पैकी ५० जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. जाटेत्तर, ओबीसी आणि दलित मतदारांनी कॉंग्रेसला नाकारत भाजपला मतदान दिलं आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हरयाणातील निकालामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी आणि दलित मतदार कुणाच्या बाजूने फिरतील, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आकडेमोडीत मोठे बदल होणार का? मतदारांची मते कोणाला मिळणार यावर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने हरयाणात मिळवलेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही यांचा प्रभाव पाहायला मिळणार आहे का, यावर चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनीही यावर लक्ष ठेवले आहे.