किरिट सोमय्या यांनी भाजप नेत्यांवर निवडणूक समितीवरून कडक टीका केली

मुंबई तक

विधानसभा निवडणूक 2024 समितीवरून किरीट सोमय्या भाजप नेत्यांसमोर नाराजी व्यक्त करतात.

ADVERTISEMENT

google news

समजून घ्या : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बऱ्याच घडामोडी होत असताना दुसरीकडे भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांच्या एका पत्राने पक्षात एकच खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुका या आता लवकरच जाहीर होतील त्या दृष्टीने भाजपने विधानसभा निवडणूक 2024 व्यवस्थापन समिती तयार केली आहे. पण याच समितीमुळे किरीट सोमय्या हे प्रचंड खवळले असून त्यांनी निवडणूक समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अत्यंत खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. थेट फडणवीस-बावनकुळेंनाच इशारा, अवमानास्पद वागणूक म्हणण्यामागे किरीट सोमय्यांची नेमकी दुखरी नस काय आहे?