गडचिरोलीत पुरामुळे ३६ तास अडकलेल्या तरुणाची सुटका

मुंबई तक

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे ३६ तास पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका तरुणाची नाट्यमय सुटका करण्यात आली.

ADVERTISEMENT

Google CTA

गडचिरोली जिल्ह्यात ८ तारखेला मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. या पुरामुळे गडचिरोलीत मोठं नुकसान झालं असून, एक तरुण तब्बल ३६ तास पुराच्या पाण्यात अडकून राहिला होता. त्याची सुटका नाट्यमय पद्धतीने करण्यात आली. हे सर्व घडले असताना स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रयत्नानं त्या तरुणाला बाहेर काढलं. त्याची तब्येत सध्या ठीक आहे. अशा प्रकारची परिस्थिती नाकारता येत नाही, परंतु प्रशासनाने केलेल्या या प्रयत्नामुळे त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले.