भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचला असद्दुदीन ओवेसींनी विरोध का केला?

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढीस लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हे सामान्य माणसांना लक्ष्य करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट करून निष्पाप लोकांची हत्या केली जाते आहे. अशा सगळ्या वातावरणात UAE मध्ये होणाऱ्या टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याला विरोध दर्शवला […]

ADVERTISEMENT

google news

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढीस लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हे सामान्य माणसांना लक्ष्य करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट करून निष्पाप लोकांची हत्या केली जाते आहे. अशा सगळ्या वातावरणात UAE मध्ये होणाऱ्या टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याला विरोध दर्शवला जातो आहे. अशात आता असदुद्दीन ओवेसी यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.