वर्षभरात ९५ हजार कोटींची दारु संपते, लस मात्र मोफत पाहिजे ! - Mumbai Tak - we finish 95 k cr liquor annually and we want vaccine free its quiet strange says bjp mla sudhir mungantiwar - MumbaiTAK
बातम्या

वर्षभरात ९५ हजार कोटींची दारु संपते, लस मात्र मोफत पाहिजे !

२०२१ वर्षात कोरोनावरची लस बाजारात आल्यानंतर पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामन भरीव तरतूद करतील अशी आशा होती. सीतारामन यांनीही कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र ही लस सर्वसामान्यां मोफत मिळणार की यासाठी पैसे द्यावे लागतील […]

२०२१ वर्षात कोरोनावरची लस बाजारात आल्यानंतर पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. सोमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामन भरीव तरतूद करतील अशी आशा होती. सीतारामन यांनीही कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र ही लस सर्वसामान्यां मोफत मिळणार की यासाठी पैसे द्यावे लागतील याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात भाजप आमदार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी महाराष्ट्रात वर्षभराताल ९५ हजार कोटींची दारु संपते आणि लस मोफत पाहिजे हे आश्चर्याचं आहे असं वक्तव्य केलं आहे. “कोरोनाच्या लसीची किंमत किती असेल यावर अर्थसंकल्पात भाष्य करायची गरज नाही. त्याची विस्तृत घोषणा नंतर होईल. गरीबांना ही लस मोफत दिली जावी ही अपेक्षा सर्वांची आहे. पण उद्या शरद पवार किंवा अजित पवार यांना ही लस मोफत का द्यायची?? शरद पवार यांच्या ड्रायव्हरला जर किमान वेतनापेक्षा कमी पगार मिळत असेल तर त्याला नक्कीच लस मोफत मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात एवढी ताकद आहे की आम्ही वर्षभरात ९५ हजार कोटीची दारु पिऊन टाकतो आणि लस मोफत पाहिजे हे आश्चर्याचं वाटतं.”

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करत निधीमध्ये वाढ केली आहे. सीतारामन यांनी आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचा घोषणा करत यासाठी ६४ हजार १८० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या निधीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सितारामन यांनी आपल्या भाषणात स्वच्छ भारत मिशनला आणखी पुढे राबवण्याची घोषणा केली आहे. भारताच्या शहरी भागांमधील अमृत योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + 15 =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग