अजित पवार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल काय म्हणाले? - Mumbai Tak - what did ajit pawar say about presidents rule in maharashtra - MumbaiTAK
बातम्या

अजित पवार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल काय म्हणाले?

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या […]

मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण तसंच आयपीएस अधिकाऱ्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रात खळबळ उडालीय. अशातच विरोधी पक्ष भाजपकडून पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जातेय.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आणि या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. मोदी सरकारमधल्या एका मंत्र्यानेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्याने या घडामोडींना मोठं गांभीर्य प्राप्त झाल्याचं दिसलं.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, राष्ट्रपती राजवटीची जे लोक मागणी करत आहेत, त्यांना सत्ता मिळाली नाही. कदाचित त्यामुळेच विरोधी पक्षांकडून अशी मागणी केली जातेय.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘अधिवेशनाच्या काळातही मी राष्ट्रपती राजवटीच्या विरोधकांच्या मागणीबद्दल बोलले. सुधीर मुनगंटीवार हे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राजवट हाच मुद्दा घेऊन बसले होते. पण मी त्यांना राष्ट्रपती राजवटीशिवाय तुमच्याकडे दुसरा मुद्दा आहे, की नाही, असं विचारलं.’

पुण्यात आता 2 एप्रिलला कठोर निर्णय घेण्याची वेळ – अजित पवारांचे लॉकडाऊनचे संकेत

Posted by Mumbai Tak on Friday, March 26, 2021

‘जनतेचे वेगवेगळे मुद्दे असतात. त्यांच्या मनात काही विचार असू शकतो. पण एकदा सांगितलं की झालं. पुन्हा पुन्हा तेच काय?’ असा सवाल अजित पवार यांनी केला.

महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातली स्थिती काही एवढी गंभीर नाही, की ज्यासाठी राष्ट्रपती राजवट लावावी. महाविकास आघाडी सरकारकडे आज स्पष्ट बहुमत आहे. १४५ हा विधानसभेतला बहुमताचा आकडा आहे. पण सरकारकडे १६५ जणांचा पाठिंबा आहे. प्रशासनही नीट काम करतंय. सर्वकाही सुरळीत सुरू आहे.’

सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आता ATSऐवजी NIA ही राष्ट्रीय तपास संस्था करतेय. त्यामुळे आता राज्याच्या यंत्रणेवर शंका घेण्याची गरज नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 4 =

…तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?