बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्रातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) त्यांच्या एका वक्तव्याने ईशान्येकडील राज्य आसाममध्ये (Assam) चांगलेच चर्चेत आहे. इतके की कडू यांच्या या वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेतही उमटले. आसाम विधानसभेत राज्यपालांचं अभिभाषण सुरु असताना तिथल्या काही आमदारांनी अभिभाषण थांबवून बच्चू कडूंच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (MLA Bacchu Kadu statment on assam dog meat)

काय म्हणाले होते बच्चू कडू?

आमदार बच्चू कडू म्हणाले होते, “महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथं त्यांना चांगली किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसं तिकडचे लोक कुत्र्याचं मांस खातात. या कुत्र्यांचा व्यापार होईल. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली, असं ते म्हणाले होते.

पण खरंच आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

विकास छेत्री यांनी ‘इंडिया टूडे’साठी लिहिलेल्या एका लेखात या प्रश्नाचं उत्तर सापडतं. आसामी लोकं कुत्र्याचं मांस खातात, हा एक फार पूर्वीपासून निव्वळ गैरसमज असल्याचं छेत्री म्हणतात. ते म्हणाले, ईशान्येतील काही लोक कुत्र्याचे मांस खातात, परंतु आसाममध्ये किंवा ईशान्य प्रदेशात ही प्रथा नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंडिया टूडेशी बोलताना आसाममधील बऱ्याच प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी कडू यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्या राज्याला योग्य तो आदर दिला जावा अशी मागणी केली आहे. अभिनव प्रयास एनजीओच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिमाला दास म्हणाल्या, बच्चू कडू यांनी जे सांगितलं ते निराधार आहे. त्यांनी आपली टिप्पणी मागे घ्यावी आणि आसामी समुदायाची माफी मागावी. आसाममधील लोक कुत्र्याचं मांस खात नाहीत आणि अशी विधानं केवळ असंवेदनशील नाहीत तर आसामी लोकांच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे चुकीचे चित्रण करणारे आहेत.

“Narayan Rane यांचं मंत्रिपद जाणार” : बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

“गुवाहाटीजवळ पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय आणि कुत्र्यांसाठी शवागृह चालवणाऱ्या जस्ट बी फ्रेंडलीच्या शशांक शेखर दत्ता यांनी महाराष्ट्राच्या आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली. “आम्ही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि सर्व राष्ट्रीय संघटनांना या विधानाविरुद्ध पावलं उचलण्याची विनंती करतो. कुत्रा हा खाद्य प्राणी म्हणून सूचीबद्ध नसल्यामुळे संबंधित मंत्रालयाने देखील ते हाती घेतले पाहिजे, असेही दत्ता म्हणाले.

ADVERTISEMENT

पशू कल्याणकारी स्वयंसेवी संस्था पीपल फॉर अॅनिमल्सनेही कडू यांच्यावर टीका केली आणि त्यांच्या टिप्पणीला अपमानास्पद म्हटलं. ईशान्येतील लोकं कुत्र्याचं मांस पसंत करतात हा अनेक दशकांपासून सिद्धांत कायम आहे. प्रदेशाच्या काही भागांमध्ये कुत्र्याचे मांस वापरणे हे तिथल्या संपूर्ण लोकसंख्येच्या खाण्याच्या सवयींचे प्रतिबिंब असू शकत नाही. अशा निराधार सिद्धांतांना पुढे केल्यानं ईशान्येकडील लोकांविरुद्ध केवळ भेदभाव आणि पूर्वग्रह वाढतो आणि अनेकदा त्यांच्याविरुद्ध वांशिक अपमान आणि हिंसाचाराचे वळण घेतलं जातं.

२०२० मध्ये नागालँडमध्ये वाद निर्माण झाला तेव्हा कुत्र्याचं मांस या गोष्टीने संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने ही प्रथा संपूर्ण राज्यात नसल्याचं सांगितलं होतं. तसंच कुत्र्याच्या मांसाच्या विक्री आणि सेवनावर बंदी घालण्यात आली होती. पण जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलं होतं. २०२१ मध्ये, आसाममधील एका कॅन्टीनमध्ये कुत्र्याचं मांस दिल्याचा दावा एका लष्करी अधिकाऱ्याने केला होता. या कथित दाव्यामुळे आसामी समुदायामध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला होता.

Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं

विकास छेत्री म्हणतात, अशा गैरसमजूतींना खोडून काढणं आणि या आवाजाचा विरोध करणं आवश्यक असतानाच, ईशान्येकडील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि पाककृतींबद्दल जागरूकता निर्माण करणं हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हा प्रदेश त्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंबित करणारे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पाककृतींचे घर आहे. बांबू शूट लोणच्यापासून ते फिश करी आणि स्मोक्ड मीटपर्यंत, ईशान्येचे अन्न तिथल्या लोकांसारखेच वैविध्यपूर्ण आहे. या प्रदेशाला आणि तेथील लोकांना खऱ्या अर्थाने जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी खूप दूर जाऊ शकतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT