अल्पसंख्याक मंत्रालय खरंच बंद केलं जाणार का? काय म्हणतंय सरकार? - Mumbai Tak - will the ministry of minorities really be closed what is the government saying - MumbaiTAK
बातम्या

अल्पसंख्याक मंत्रालय खरंच बंद केलं जाणार का? काय म्हणतंय सरकार?

केंद्र सरकार अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याची शक्यता असल्यासंबंधीचे आरोप करणारं वृत्त चुकीचं आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं आहे अल्पसंख्याक मंत्रालयाने या वृत्ताचं खंडन केलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. त्याविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्या या खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारतर्फे […]

केंद्र सरकार अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याची शक्यता असल्यासंबंधीचे आरोप करणारं वृत्त चुकीचं आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं आहे अल्पसंख्याक मंत्रालयाने या वृत्ताचं खंडन केलं आहे.

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. त्याविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या बातम्या या खोट्या आहेत, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारतर्फे देण्यात आले. संबंधित वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याविषयी पीआयबीने डेक्कन हेराल्ड या इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताचा हवाला देऊन म्हटले की, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याचा दावा हा पूर्णपणे खोटा आहे.

प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने काय म्हटलं आहे?

अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही पीआयबीने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील हे ट्विट रिट्विट केले आहे. देशात स्वतंत्र अल्पसंख्यांक मंत्रालयाची कोणतीही आवश्यकता नाही. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने लांगुलचालनासाठी हे मंत्रालय निर्माण करण्यात आले, असे केंद्र सरकारचे मत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. या मंत्रालयास बंद करून त्यास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारित आणले जाणार असल्याचेही संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले होते.

काय देण्यात आली होती बातमी?

UPA सरकारच्या काळात २००६ मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली होती. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार अल्पसंख्याक मंत्रालय बंद करणार आहे. हे मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात विलीन केलं जाऊ शकतं असंही वृत्त देण्यात आलं आहे मात्र या सगळ्यावर स्पष्टीकरण देत असा कोणताही विचार नसल्याचं सरकारने म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांनी काय म्हटलं आहे?

अल्पसंख्याक खात्याबाबत सध्या उलटसुलट चर्चा आहेत. मात्र या सगळ्या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका या आशयाचं ट्विट PIB ने केलं आहे. हेच ट्विट स्मृती इराणी यांनी रिट्विट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!