तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

IL and FS case,Jayant Patil outside ED office after 9 hours of interrogation:
IL and FS case,Jayant Patil outside ED office after 9 hours of interrogation:
social share
google news

IL and FS case,Jayant Patil outside ED office after 9 hours of interrogation: इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील कार्यालयात आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर नुकतेच जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर प़डताच त्या्ंनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयातील संपूर्ण चौकशी मागचा तपशील सांगितला आहे. (after 9 hours of interrogation in ed office ncp jayant patil share reaction)

तब्बल 9 तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी कधीच केलेल्या नाहीत. म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने ईडीच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. माझ्या उत्तराने त्यांचे संपूर्ण समाधान झाले आहे.तसेच मला वाटत नाही त्यांच्याकडे आता काही प्रश्न शिल्लक असतील,असे देखील जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत. तसेच आपण शरद पवारांचे (Sharad pawar) सैनिक आहोत, असेच लढायचं आहे, असा आत्मविश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.

हे ही वाचा : ‘लहरी माणूस, दोन चमत्कार…’, PM मोदींवर शरद पवारांची पुणेरी टोलेबाजी

तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लांबचा प्रवास करून इथे आलात आहात. सकाळपासून या ठिकाणी वेळ घालवला आहात. आता आपण सगळ्यांनी शांततते घरी जायला हरकत नाही. शांततेत जा, गडबडीत जाऊ नका, हवं तर सकाळी जा, असा सल्ला देखील जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच सर्वांचे मनपुर्वक आभार, मला जे समर्थन दिलंत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. भविष्यात असाच पाठींबा,अशीच ताकद मिळेल अशी अपेक्षा करतो,असे देखील जयंत पाटील (Jayant Patil)म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रकरण काय?

ज्या प्रकरणी पाटील यांना ईडीने समन्स बजावलं आहे, ते प्रकरण आहे आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचं. ईडीने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गेल्या आठवड्यात सर्च ऑपरेशन रावबलं होतं.

ADVERTISEMENT

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने या प्रकरणी ऑगस्ट 2019 मध्ये चौकशी केली होती. 2005 मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. 3 आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद: नाना पटोले

राज ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले होते. आयएल अॅण्ड एफएस यांनी विविध कंपन्या व संस्थांना दिलेल्या कर्ज व्यवहाराबद्दल ईडीला संशय आहे. त्याबाबत आता तपास सुरू आहे. आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने 2018 मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT