"जो हिंदीचा विषय आहे, आमच्यासाठी तो...", CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान! पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

CM Devendra Fadnavis Press Conference : "जो हिंदीचा विषय आहे, आमच्यासाठी तो मराठीचा विषय आहे. कारण राज्यात आम्ही मराठी अनिवार्य केलीय. हिंदी ऑप्शनल केलीय.

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis Press Conference
CM Devendra Fadnavis Press Conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिंदी भाषेबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान

point

हिंदी ऑप्शनल केलीय. कोणतीही भारतीय भाषा..

point

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis Press Conference : "जो हिंदीचा विषय आहे, आमच्यासाठी तो मराठीचा विषय आहे. कारण राज्यात आम्ही मराठी अनिवार्य केलीय. हिंदी ऑप्शनल केलीय. कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल, अशाप्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे. झोपलेल्या उठवता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्या उठवता येत नाही. म्हणून याचा थोडासा प्रवास सगळ्यांना समजला पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधी कर्नाटकने लागू केलं. नंतर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मग उत्तरप्रदेशने लागू केलं. हिंदी भाषा सक्तीची नाही, असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. 

दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला..

त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही यावर सांगोपांग चर्चा केली. कोणत्या वर्गापासून हे सूत्र लागू करण्यात यावे, यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एक समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये कोणकोणते सदस्य असतील, याची माहिती लवकरच दिली जाईल. या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू केले जाईल. 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 चे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोठं विधान फडणवीस यांनी केलं.

पत्रकार परिषदेत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस पुढे म्हणाले, 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे शैक्षणिक धोरण कशाप्रकारे लागू करायचं, यासाठी एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा जीआर निघाला. नामवंत शास्त्रज्ञ, अभ्यासत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 18 लोकांची कमिटी तयार करण्यात आली. त्यांनी उद्धव ठाकरे यांना 101 पानाचा अहवाल सादर केला. अहवालाच्या आठव्या प्रकरणात भाषेचा विषय आहे.

हे ही वाचा >> मराठी कामगारांना कामावरून काढून टाकण्याची कंत्राटदाराची धमकी

पृष्ठ क्रमांक 56 वर भाषेसंदर्भात उपगट आहे. इंग्रजी आणि हिंदी पहिलीपासून सक्तीची करण्यात यावी, असा हा अहवाल आहे. उद्धव ठाकरे यांची सही आहे. तिसऱ्या भाषेमुळं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये मार्क्स मिळतील. पुढच्या अॅडमिशनसाठी ते मार्क्स कामी येतील. त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातून देण्यात आली आहे.

महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे. आम्ही विरोधी पक्षाला चहापानासाठी बोलावलं होतं. परंतु, नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार टाकल्यावर त्यांनी भलंमोठं पत्र आम्हाला दिलं आहे. पत्र मोठं असलं तरी, मजकूर मोठा नाहीय. मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत, तेच मुद्दे आहेत. एक दोन नवीन विषय त्यांनी मांडले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा >> सोनम-मुस्कानपेक्षाही खतरनाक निघाली सुमंगला! डोळ्यात मिरची पावडर टाकून पतीचा गेमच केला, पोत्यात मृतदेह भरला अन्..

मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्या पत्रात व्याकरणाच्या चोवीस चूका आहेत. पण काही हरकत नाही, बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकल्याने अशी परिस्थिती येते. आज पत्रकार परिषदेत भास्कर जाधव दिसले नाहीत. मागच्या वेळी भास्कररावांची सही होती. आता ती सही पण पत्रात दिसत नाही. आजच्या सह्या बघितल्या तर उबाठाच्या तीन, काँग्रेसच्या तीन आणि शरद पवार यांच्या गटाच्या दोन सह्या आहेत, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.

विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत म्हणाले, आमच्या कामांना स्थगिती मिळालीय. वडेट्टीवारांना उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत, असं वाटतंय. त्यामुळे स्थगितीच्या कामांबाबत बोलले. पण जितेंद्र आव्हाडांनी बोफर्सची आठवण काढली. बोफोर्सचा घोटाळा झाला होता, हे जितेंद्र आव्हाडांना मान्य आहे. त्यामुळे त्यांनी बोफोर्सचे घोटाळे चालले आहेत, असा घरचा आहेर त्यांनी दिलेला आहे. कोणतीही कल्पकता, कोणतेही नवीन विषय, लोकाभिमुखता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही, असंही फडणवीस म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp