सेनेने घेतलेली भूमिका ‘अनाकलनीय’; द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

ऋत्विक भालेकर

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून फटकारले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी चर्चा करुन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या निर्णयावर काँग्रेसचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून फटकारले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांशी चर्चा करुन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटमध्ये बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) काय म्हणाले?

”राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.”

”शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?”

”शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp