ठाकरे गटाला धक्का : दिल्ली हायकोर्टानं याचिका फेटाळली; निवडणूक आयोगाला सर्वाधिकार

मुंबई तक

दिल्ली : उच्च न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का दिला आहे. धनुष्य-बाण गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसंच चिन्हाबाबतच्या निर्णयाचे आयोगालाच सर्वाधिकार असल्याचं स्पष्ट करतं तातडीने अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. ठाकरे-शिंदेंच्या वादात अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिल्ली : उच्च न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का दिला आहे. धनुष्य-बाण गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. तसंच चिन्हाबाबतच्या निर्णयाचे आयोगालाच सर्वाधिकार असल्याचं स्पष्ट करतं तातडीने अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाकरे-शिंदेंच्या वादात अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. निर्णयावेळी आयोगाकडून प्रक्रियांचं पालन झालं नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी काल (सोमवारी) सुनावणीही पार पडली होती.

पक्षचिन्हाच्या अंतिम निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला सर्वाधिकार आहेत. त्यामध्ये न्यायालय पडत नाही, असं सांगत शिवसेनेची याचिका फेटाळून लावली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेशही न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलंच असणार हे आता स्पष्ट झालं आहे.

सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी काय झालं?

  • ठाकरे गटाने काय म्हटलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp