महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? संजय राऊत यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?

मुंबई तक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी घेतली जाणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना सामोरे जाताना उद्धव ठाकरे काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्धव ठाकरे यांची मुलाखत नेमकी काय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी घेतली जाणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना सामोरे जाताना उद्धव ठाकरे काय उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उद्धव ठाकरे यांची मुलाखत नेमकी काय असणार आहे त्याची उत्सुकता शिगेला!

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? नक्की काय चुकलं असं वाटतं? आत्ता जे बंड शिवसेनेत झालं आहे तेवढं मोठं बंड राणे-भुजबळांनाही करता आलं नव्हतं मग या बंडाबाबत काय सांगाल?असे अनेक थेट प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी या मुलाखतीचा टिझर ट्विट केला आहे. त्यातही हे प्रश्न आहेत, याशिवायही अनेक प्रश्न थेटपणे विचारले गेले असणार आणि उद्धव ठाकरे त्याची थेट उत्तरं देणार हे उघड आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? हाच. या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे काय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा उदय कसा झाला?

महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात २०१९ मध्ये झाला. भाजप आणि शिवसेनेने महायुती महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ असं १६१ जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचं या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं भांडण झालं. त्यानंतर महायुती तुटली. महायुती तुटल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत येण्याची खलबतं सुरू झाली. त्याच दरम्यान राज्यात पहाटेचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र शरद पवारांनी अजित पवारांनी केलेलं बंड मोडून काढलं. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचं सरकार ७२ तासात कोसळलं.

Uddhav Thackeray: “धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहणार”

हे वाचलं का?

    follow whatsapp