शिंदेंचं बंड: ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास’, शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?

मुंबई तक

मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ 30 आमदारांच्या साथीने बंडाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदेच्या या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच सगळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र मोठं विधान केलं आहे. ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ 30 आमदारांच्या साथीने बंडाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदेच्या या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच सगळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र मोठं विधान केलं आहे. ‘या परिस्थितीतून मार्ग निघेल यावर मला पूर्ण विश्वास आहे.’ असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारला सावरण्यासाठी शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी असाही विश्वास व्यक्त केला आहे की, महाराष्ट्रातील सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच चालणार. नेतृत्व बदल करण्याची काही गरज आहे असं आम्हाला वाटत नाही.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

‘जे काही महाराष्ट्रात झालं आहे ते तिसऱ्यांदा झालं आहे. याआधी दोनदा असा प्रकार झाला होता. मला आठवतंय की, जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थापन झालं होतं त्याआधी आमच्या काही आमदारांना उचलून इथं हरियाणातील काही भागात ठेवलं होतं. पण नंतर तिथून ते सुखरुपपणे निघाले. त्यानंतर आम्ही सरकार बनवलं. सरकार बनविल्यानंतर मागील अडीच वर्ष सरकार योग्य पद्धतीने चाललं आहे.’ असं शरद पवार सुरुवातीला म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp