“मी एवढ्यासाठी थांबलो होतो पण..” शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले गजानन किर्तीकर?

मुंबई तक

ठाकरे गटाचे संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं बळ वाढल्याची चर्चा होते आहे. अशातच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. कारण गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर गजानन किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाकरे गटाचे संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं बळ वाढल्याची चर्चा होते आहे. अशातच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. कारण गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर गजानन किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गजानन किर्तीकर शिंदे गटात आल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?

गजानन किर्तीकर आपल्यासोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर काय म्हणाले गजानन किर्तीकर?

आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा. सगळ्या खासदारांनी सांगितलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. धोरणात काहीही बदल न झाल्याने १२ खासदार बाहेर पडले. मी थांबलो होतो मला वाटलं होतं की काही बदल होतो आहे का? ते पाहावं. मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे मी अखेर साथ सोडली असं गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले गजानन किर्तीकर?

एका योग्य मार्गाने शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. तो मला स्पष्ट दिसला. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत आहेत. या आपुलकीने मी या संघटनेत प्रवेश केला असंही गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp