Raj Thackeray: …तर संभाजीनगरमध्ये भयानक घटना घडली असती: राज ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मला जर प्रकरण भडकवायचं असतं तर ते संभाजीनगरलाच भडकलं असतं. भाषणावेळी प्रकरण काय लेव्हलला गेलं असतं सांगा..’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

मला राज्यातील शांतता बिघडवायची नाही. त्यामुळेच संभाजीनगरला माझ्या भाषणावेळी बांग झाली तेव्हा मी हे प्रकरण पोलिसांना सांगितलं. असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्याला राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा काही हेतू नसल्याचं म्हटलं आहे.

पाहा मनसे अध्यक्ष नेमकं काय म्हणाले संभाजीनगरमधील त्या घटनेविषयी:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मी काल पण सांगितलंय आणि पुन्हा सांगतोय. हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही. याला धार्मिक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आमची अजिबात इच्छा नाही की, महाराष्ट्रातील, देशातील शांतता बिघडावी, दंगली घडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.’

‘तुमच्या जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्यावेळेला तिकडे बांग दिली गेली त्यावेळी मी हे पोलिसांना सांगितलं. अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेव्हलला प्रकरण गेलं असतं सांगा..’

ADVERTISEMENT

‘आम्ही ही गोष्ट शांततेमध्ये समजून सांगतोय. सरकारने देखील ही गोष्ट ऐकावी, समजून घ्यावी. आता त्या आमच्या लोकांची धरपकड.. कशासाठी धरपकड करताय? मोबाइलच्या काळात? म्हणजे कम्युनिकेशनची साधनं एवढ्या वाढलेल्या आहेत. तुम्ही माणसं पकडून काय होणार आहे. काय लागणार तुमच्या हाती.’

ADVERTISEMENT

‘हे अजून 60-70 च्या दशकातला विचार करतायेत का? की, राज ठाकरेचं भाषण सुरु झाल्यावर तिकडी वीज बंद करा. अरे वीज काय बंद करायची मोबाइलवर दिसतं की भाषण. इतका मूर्खपणा.. हे कुठच्या काळात आहेत.’

‘मला हेच सांगायचं आहे की, हा काही एक दिवसाचा विषय नाही. हिंदू बांधवांना हेच सांगायचं आहे. हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या-ज्या मशिदीमधील मौलवी ऐकणार नाहीत. जिकडे लाऊडस्पीकर लागतील तिकडे त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागला गेला पाहिजे.’

‘मुंबईचे पोलीस 135 मशिदींवर काय कारवाई करणार हे एकदा समजू देत. ते त्यांच्या धर्माला जर घट्ट असतील तर आम्हाला पण आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. या सगळ्याचा पोलिसांनी विचार करावा. मला असं वाटतं की, महाराष्ट्रात शांतता नांदावी, लाऊडस्पीकर बंद व्हावेत. जेव्हा तुम्हाला सणासुदीला लागतात तेव्हा हरकत नाही. पण 365 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार-पाच वेळा जर बांग ऐकवणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय.’

‘याचा महिलांना, विद्यार्थ्यांना, रुग्ण यांना त्रास होतो. एवढं पण समजत नाही. म्हणजे यांचा धर्म मोठा माणुसकीपेक्षा? परंतु मी परत सांगेन आपल्याला ज्या मशिदीवरचे सकाळचे अजान झाली नाही त्यांनी देखील यापुढे प्रार्थना म्हणायची असेल एक तर पोलिसांनी हे भोंगे खाली आणावेत. काय प्रार्थना करायची असेल ती मशिदीत करा. हे आवाज बंद झाले पाहिजेत एवढीच मी अपेक्षा करतोय.’

‘परत एकदा सांगतोय हा विषय एक दिवसाचा नाही. हा विषय फक्त 4 तारखेचा नाही. हा कायमस्वरुपी राहणार. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोवर.’ असं म्हणत राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायम आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT