राज्यसभा निवडणूक: संजय राऊतांनी काँग्रेसला दिला ‘हा’ सल्ला!
पुणे: महाविकास आघाडी घडविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट काँग्रेसलाच सल्ला दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तोलामोलाची माणसं आहेत असं असताना काँग्रेस महाराष्ट्रातून राज्यसभेवर बाहेरची माणसं का पाठवत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहा संजय राऊत नेमकं काय […]
ADVERTISEMENT

पुणे: महाविकास आघाडी घडविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट काँग्रेसलाच सल्ला दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तोलामोलाची माणसं आहेत असं असताना काँग्रेस महाराष्ट्रातून राज्यसभेवर बाहेरची माणसं का पाठवत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
‘खरं तर राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तरीही देशातलं राजकारण पाहता काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीने पावलं टाकायला हवी होती असं मला वाटतं.’
‘गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष राज्यसभेवर बाहेरची माणसं पाठवतो आहे. नक्कीच त्याचा परिणाम राज्यातील काँग्रेस पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. महाराष्ट्रात काय तोलामोलाची माणसं काय कमी नाहीत काँग्रेस पक्षात.’ असा एक सल्लाच संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.