'मी Gen Z वर डोळे बंद करून विश्वास ठेवेन', आंदोलन आणि लाठीचार्जच्या प्रश्नावर मोहन भागवत असं का म्हणाले?

मुंबई तक

Mohan Bhagwat and Gen z: मुंबईतील विशेष कार्यक्रमात RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen Z पिढी, विद्यार्थी आंदोलन आणि संवादाच्या गरजेवर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. "डोळे बंद करून विश्वास ठेवायचा असेल तर मी Gen Z वर ठेवेन," असे म्हणत त्यांनी आंदोलनकर्त्यांबाबत स्पष्ट मत व्यक्त केले.

ADVERTISEMENT

rss sarsanghchalak mohan bhagwat gen z statement on student protests bjp mumbai
मोहन भाैगवत
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील कार्यक्रमात मोहन भागवत यांचा Gen Z सोबत संवाद.

point

Gen Z आणि Gen Alpha पिढी अधिक प्रामाणिक असल्याचा दावा.

point

लाठीचार्ज आणि पेलेट गन प्रकरणावर संपूर्ण माहिती नसल्याने भाष्य करण्यास नकार.

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी (6 ऑगस्ट) मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात Gen Z पिढीशी संवाद साधताना विद्यार्थी आंदोलन, संवादाची गरज आणि नव्या पिढीबाबत आपले स्पष्ट मत मांडले. अलीकडील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी, "जर मला डोळे बंद करून विश्वास ठेवायला सांगितलं, तर मी Gen Z वर विश्वास ठेवेन," असे महत्त्वाचे विधान केले.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नावर भागवत यांनी संयमित भूमिका घेतली.

ते म्हणाले, "हे का घडलं, याची कारणं समजून घेतली पाहिजेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं, यावर मी निश्चित मत व्यक्त करू शकत नाही." भागवत यांनी माध्यमांमधील विविध दाव्यांचाही उल्लेख केला. काही ठिकाणी आंदोलनात काही 'मॉड्यूल्स' असल्याच्या बातम्या वाचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्या बातम्यांची सत्यता तपासलेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्वाधिक चर्चेत आलेले विधान करत म्हटले, "मला काय खरं, काय खोटं हे माहीत नाही. पण जर मला डोळे बंद करून विश्वास ठेवायला सांगितलं, तर मी Gen Z वर विश्वास ठेवेन." आता त्यांच्या याच विधानाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

पाहा मुलाखतीत मोहन भागवत नेमकं काय-काय म्हणाले...

प्रश्न: तुम्ही मान्य करता की, संवाद जर पहिल्यापासूनच सुरू झाला असता तर हा विषय वाढलाच नसता.