Maharashtra Political Crisis : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या ‘सुप्रीम’ फैसला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs Eknath shinde : supreme court verdict on maharashtra political crisis on 11 may
Uddhav Thackeray vs Eknath shinde : supreme court verdict on maharashtra political crisis on 11 may
social share
google news

Surpeme court judgement on Maharashtra political crisis : ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागलं आहे, त्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाची तारीख अखेर ठरली! सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ 11 मे रोजी या प्रकरणावर निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत कुणाचा जय होणार, यामुळे उत्सुकता वाढली आहे. (Supreme Court Constitution Bench to deliver the judgment in ShivSena case tomorrow, says CJI DY Chandrachud)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर धनुष्यबाण आणि शिवसेना नावही ठाकरेंना गमवावं लागलं.

शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सुरू झालेला राजकीय सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात गेला. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रमुख मुद्द्यासह इतर मुद्द्यांवरील याचिकांच हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यी घटनापीठाकडे पाठवलं. त्यानंतर या प्रकरणावर सुर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सलग सुनावणी झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वकिलांची तगडी फौज, कायद्याचा पडला किस

उद्ध ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे, एन. के. कौल, महेश जेठमलानी आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद केला. तर मनिंदर सिंग यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वतीने युक्तिवाद केला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : या प्रश्नांची मिळणार उत्तरं…

-एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेत मोठ बंड झालं. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रकरणावर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निकाल देणार आहे.

ADVERTISEMENT

-विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबद्दल अपेक्षित महत्त्वाचा निकाल आणि सभापतींना हटवण्याची मागणी करणारी पूर्वसूचना सभागृहासमोर प्रलंबित असल्यास आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर पुढे जावे की नाही, यासंदर्भात हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे.

ADVERTISEMENT

-पक्षांतर, विलीनीकरण आणि दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेशी संबंधित अनेक महत्त्वाचे घटनात्मक प्रश्नांची उत्तरं या प्रकरणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून मिळणार आहे.

-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या निर्णयाच्या वैधतेबद्दलही निकालात स्पष्टता असू शकते.

-एकट्या विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या एका गटाचा पाठिंबा असलेल्या गटाला पक्ष म्हणता येईल का, याचं उत्तरही सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने मिळणार आहे.

आमदारकी संकटात असलेले ते 16 आमदार कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (आमदार, कोपरी-पांचपाखाडी)
तानाजी सावंत (आमदार, भूम परंडा)
अब्दुल सत्तार (आमदार, सिल्लोड)
यामिनी जाधव (आमदार, भायखळा)
संदीपान भुमरे (आमदार, पैठण)
भरत गोगावले (आमदार, महाड)
संजय शिरसाठ (आमदार, छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
लता सोनावणे (आमदार, चोपडा)
प्रकाश सुर्वे (आमदार, मागाठाणे)
बालाजी किणीकर (आमदार, अंबरनाथ)
बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड उत्तर)
अनिल बाबर (आमदार, खानापूर)
संजय रायमूलकर (आमदार, मेहेकर)
रमेश बोरनारे (आमदार, वैजापूर)
चिमणराव पाटील (आमदार, एरोंडोल)
महेश शिंदे (आमदार, कोरेगाव)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT