Uddhav Thackeray : केजरीवालांनंतर ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र हादरणार!  

भागवत हिरेकर

Uddhav Thackeray News : भाजपने उद्धव ठाकरे यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांवर तपास यंत्रणांकडून कारवाई होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Uddhav Thackeray Maharashtra Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. या अटकेचे राजकीय पडसाद महाराष्ट्रातही उमटले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. दुसरा आणखी मुद्दा चर्चेत आला तो, आता पुढचा क्रमांक कुणाचा. कारण आधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली गेली, त्यानंतर केजरीवाल. महाराष्ट्रात अशीच कारवाई ठाकरेंविरुद्ध होऊ शकते, या चर्चेने तोंड वर काढलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून जाहीरपण तसे संकेत दिले जात आहेत. तेच समजून घ्या...

ठाकरेंच्या दिशेने मोर्चा... क्रोनोलॉजी बघा

अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यानंतर लगेच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले. ते म्हणाले की, "भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात जाऊ शकतो तर टक्केवारीवाला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो." भातखळकरांच्या या पोस्टनंतर गुरुवारी (२२ मार्च) किरीट सोमय्यांनी मद्य धोरणाचा मुद्दा काढला.

atul bhatakhalkar tweet about uddhav Thackeray.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्विट.

हेही वाचा >> ठाकरेंची शिवसेना जिंकणार महाराष्ट्रातील 'एवढ्या' जागा, ही आहे संपूर्ण यादी! 

किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात की, "ठाकरे सरकारनेही जानेवारी 2022 मध्ये वाईन घोटाळा केला होता. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अबकारी मद्य धोरण जानेवारी 2022 मध्ये बदलले होते." 

"संजय राऊतांच्या कुटुंबाने अशोक गर्ग मॅगपाई डीएफएस प्रा. लि.च्या माध्यमातून महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. आम्ही महाराष्ट्रातील हा वाईन/मद्य घोटाळा उघडकीस आणला होता", असे सोमय्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांच्या पोस्टनंतर आमदार नितेश राणेंनी तर याचे संकेतच दिलेत.

    follow whatsapp