नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर बिहारच्या अन् देशाच्या राजकारणात पुढे काय होणार?

मुंबई तक

बिहारमध्ये मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. नितीश कुमार यांनी त्यांचा जुना मित्र पक्ष भाजपशी संबंध तोडण्याची ही दुसरी वेळ आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी 2013 मध्ये भाजपशी फारकत घेतली होती. मात्र, 2017 मध्ये त्यांनी महाआघाडी सोडून भाजपशी मैत्री केली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बिहारमध्ये मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ झाली. नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. नितीश कुमार यांनी त्यांचा जुना मित्र पक्ष भाजपशी संबंध तोडण्याची ही दुसरी वेळ आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी 2013 मध्ये भाजपशी फारकत घेतली होती. मात्र, 2017 मध्ये त्यांनी महाआघाडी सोडून भाजपशी मैत्री केली होती.

बिहारमध्ये आता जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीसह नवीन सरकार येणार आहे. मात्र, यावेळीही मुख्यमंत्री नितीशकुमारच असणार आहेत तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होऊ शकतात. तेजस्वी यादव यांनी गृहमंत्रालय देखील मागितले आहे. बिहारच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीचा परिणाम देशाच्या राजकारणावरही होणार आहे.

बिहारच्या राजकीय परिस्थितीचे महत्त्वाचे मुद्दे

1) नितीश कुमार असे नेते आहेत ज्यांचा राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नाही. नितीश कुमार यांनी यापूर्वी सत्तेसाठी अनेक आघाड्या केल्या आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता असताना त्यांनी एनडीए सोडली आणि आरजेडीशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्यांनी आरजेडी सोडली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत पुन्हा आले होते.

2) भाजपला सोडचिठ्ठी देऊन, आता नितीश कुमार RJDशी हातमिळवणी करून बिहारच्या राजकारणात टिकून राहणार आहेत. बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीत ज्युनियर पार्टनर असूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले होते. नितीश कुमार यांना हाताशी धरुन भाजपचा आपला पाया मजबूत करण्याचा विचार होता. भाजपला बिहारमध्ये स्वत:चा मुख्यमंत्री बसवायचा होता अशी चर्चा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp