BJP: ‘मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नाही..’ नेमकी कोणी केली भीष्मप्रतिज्ञा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nitish Kumar big Statement on BJP Alliance: पटना: बिहारमधील (Bihar) सत्ताधारी JDU मधील राजकीय गदारोळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘मरेपर्यंत भाजपसोबत (BJP) जाणार नाही’, असं वक्तव्य आता नितीश कुमार यांनी केलं आहे. ‘मला मरण मान्य आहे, पण आता भाजपसोबत जायचे नाही.’ अशी मोठी घोषणाच नितीश कुमार यांनी केली आहे. (will not go with BJP till death cm nitish kumars big announcement)

नितीश कुमार म्हणाले की, ‘आम्ही अटलजींना मानणारे लोक आहोत.’ त्यांनी यावेळी असाही दावा केला की, ‘आम्ही भाजपला सोडलं होतं. पण ते स्वतः जबरदस्तीने आमच्यासोबत आले. 2020 मध्ये तर आम्हाला मुख्यमंत्री पदही नको होतं, पण त्यांनी काय केले ते सर्वांनी पाहिले. आम्ही त्यांना किती मान दिला. पण यावेळी निवडणूक होऊ द्या, कोण किती जागा जिंकतो हे सर्वांना कळेल.’ असं नितीश कुमार म्हणाले.

दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांची भेट, नव्या राजकीय समीकरणांची नांदी?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नितीश कुमार यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. जेडीयूचे बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा उपेंद्र कुशवाह यांनी केला होता. यापूर्वी जेव्हा उपेंद्र कुशवाह यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचा फोटोही काही भाजप नेत्यांसोबत समोर आला होता. यानंतर कुशवाह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपण जेडीयूशिवाय कुठेही जात नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले.

Jayant Patil :”एकनाथ शिंदे दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं करू शकतात, कारण…”

ADVERTISEMENT

भाजप नितीशसोबत तडजोड करणार नाही- सुशील मोदी

याआधी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी म्हणाले की, ‘आता भाजप नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही किंमतीत तडजोड करणार नाही. सुशील कुमार मोदी म्हणाले की, बिहार प्रभारी विनोद तावडे यांनीही राज्य कार्यकारिणीत स्पष्ट केले आहे की, नितीशकुमार हे आता कोणत्याही आघाडीसाठी ओझे बनलेले आहेत. नितीश यांची मतं मिळविण्याची क्षमता संपलेली आहे. 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये प्रचार केला नसता तर JDU 15 जागाही जिंकू शकलं नसतं. नितीश यांच्या जाण्याने भाजप खूश आहे.’ असं म्हणत सुशीलकुमार मोदींनी नितीश कुमारांवर जोरदार टीका केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT