Asia Cup 2022: श्रीलंकेकडून शेवटच्या षटकात पराभव, तरीही भारत अंतिम फेरीत पोहोचू शकेल?
श्रीलंकेविरुद्ध करो किंवा मरोच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने दिलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने शेवटच्या षटकात पूर्ण केले आहे. यामुळे टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता मावळली आहे. भारत आशिया कपमधून जवळपास बाहेर पडला आहे. श्रीलंकेला शेवटी 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. श्रीलंकेच्या फलंदाजांना अर्शदीप सिंगच्या चेंडूवर मारा करता आला नाही, […]
ADVERTISEMENT

श्रीलंकेविरुद्ध करो किंवा मरोच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने दिलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने शेवटच्या षटकात पूर्ण केले आहे. यामुळे टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता मावळली आहे. भारत आशिया कपमधून जवळपास बाहेर पडला आहे.
श्रीलंकेला शेवटी 2 चेंडूत 2 धावांची गरज होती. श्रीलंकेच्या फलंदाजांना अर्शदीप सिंगच्या चेंडूवर मारा करता आला नाही, चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला आणि तिथून गोलंदाजाकडे आला. परंतु भारतीय खेळाडूंना धावा वाचवता आल्या नाहीत आणि सामन्यात हार मानवी लागली. श्रीलंकेला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती, अर्शदीप सिंगने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
अर्शदीप सिंगचे शेवटचे षटक: (श्रीलंकेला विजयासाठी 7 धावांची गरज)
19.1 ov: 1 धाव
19.2 ov: 1 धाव