IPL 2021 : हर्षल पटेलची हॅटट्रीक, मुंबईचा सलग तिसरा पराभव, RCB चा रथ विजयपथावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हर्षल पटेलने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हॅटट्रीकच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ अखेरीस विजयपथावर आला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ५४ रन्सनी मात करत RCB ने आपलं आव्हान कायम राखलं आहे. विजयासाठी मिळालेल्या १६६ रन्सचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १११ धावांवर संपुष्टात आला.

आयपीएलच्या इतिहासात RCB कडून हॅटट्रीक करणारा हर्षल पटेल तिसरा बॉलर ठरला आहे. याआधी प्रवीण कुमार आणि सॅम्युअल बद्रीने RCB कडून हॅटट्रीक केली आहे. याच हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या. आज त्याच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हर्षलने हॅटट्रीक घेत आपलं महत्व सिद्ध केलं आहे.

सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या RCB ची सुरुवात खराब झाली. सलामीवीर देवदत पडीक्कल बुमराहच्या बॉलिंगवर शून्यावर आऊट झाला. यानंतर कॅप्टन कोहली आणि के.एस.भारतने संघाचा डाव सावरला. विराटने मुंबईच्या बॉलर्सवर हल्लाबोल करत संघाची बाजू मजबूत केली. दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची पार्टनरशीप केल्यानंतर भारत राहुल चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनेही विराटला चांगली साथ देत मुंबईच्या बॉलर्सचा समाचार घ्यायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यादरम्यान विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी मैदानात रंगात आलेली असतानाच मिल्नेने विराटला अर्धशतकाचा आनंद साजरा करु दिला नाही. ५१ धावांची इनिंग खेळून तो माघारी परतला. यानंतर RCB च्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांवर अंकुश लावत मुंबईने प्रतिस्पर्धी संघाला १६५ धावांवर रोखलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ३ तर ट्रेंट बॉल्ट-मिल्ने-चहर यांनी १-१ विकेट घेतली.

IPL 2021 : T-20 क्रिकेटमध्ये कॅप्टन कोहलीची धाकड कामगिरी, शिरपेचात मानाचा तुरा

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल, मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात चांगली झाली. क्विंटन डी-कॉक आणि कर्णधार रोहित शर्माने संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. दोघांनीही पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत चांगल्या धावा जमवल्या. पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी झाल्यानंतर चहलने डी-कॉकला आऊट करत मुंबईची जोडी फोडली. यानंतर रोहित शर्माही ठराविक अंतराने मॅक्सवेलच्या बॉलिंगवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आऊट झाला.

ADVERTISEMENT

यानंतर मुंबईचा एकही फलंदाज मैदानावर तग धरु शकला नाही. इशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या हे हजेरीवीर ठरले. मधल्या फळीत कायरन पोलार्डकडून संघाला अपेक्षा होती. परंतू हर्षल पटेलने हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि राहुल चहरला आऊट करत हॅटट्रीकची नोंद केली. यानंतर मुंबईचं उरलं सुरलं आव्हानही संपुष्टात आलं. मुंबईच्या शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधी न देता RCB ने १११ धावांवर डाव संपवत ५४ धावांनी सामन्यात बाजी मारली. या विजयानंतर RCB पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आला असून मुंबईच्या प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याच्या क्षमता धूसर झाल्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT