IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?

मुंबई तक

सध्याच्या घडीला भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती आपल्याला नवीन नाहीये. प्रत्येक दिवशी आपण रुग्णसंख्येत होणारी वाढ, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनचा तुडवडा अशा अनेक बातम्या पाहत आहोत. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका आता आयपीएललाही बसायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यात राजस्थान रॉयल्सचा अँड्रू टाय, चेन्नईचा जोश हेजलवूड, दिल्ली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्याच्या घडीला भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती आपल्याला नवीन नाहीये. प्रत्येक दिवशी आपण रुग्णसंख्येत होणारी वाढ, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनचा तुडवडा अशा अनेक बातम्या पाहत आहोत. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फटका आता आयपीएललाही बसायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यात राजस्थान रॉयल्सचा अँड्रू टाय, चेन्नईचा जोश हेजलवूड, दिल्ली कॅपिटल्सचा रविचंद्रन आश्विन आणि RCB च्या केन रिचर्डसन आणि अॅडम झॅम्पा यांचा समावेश आहे.

२९ एप्रिलपासून भारतात आयपीएलच्या चौदाव्या सिझनला सुरुवात झाली. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा प्रेक्षकांविना आणि बायो सिक्युअर बबलमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू देशातलं सध्याचं कोरोनामुळे निर्माण झालेलं वातावरण पाहता यंदाच्या हंगामाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. मग असं नेमकं झालं तरी काय की खेळाडू अचानक स्पर्धेतून माघार घेत आहेत?

परंतू या गोष्टीत एक मुद्दा महत्वाचा ठरतो तो म्हणजे भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आयपीएलचं आयोजन करणं योग्य आहे का? काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्टने भारतातल्या कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आयपीएल खेळवण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp