Happy Birthday Rahul Dravid : शांत द्रविडला राग येतो तेव्हा काय होतं?
Rahul Dravid Birthday: आज (11 जानेवारी) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला द्रविड 50 वर्षांचा झाला आहे. क्रीडा जगतातील दिग्गजांसह चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 1973 मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडची स्वतःची एक वेगळी शैली आहे आणि तो त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. […]
ADVERTISEMENT

Rahul Dravid Birthday: आज (11 जानेवारी) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा वाढदिवस आहे. द वॉल या नावाने प्रसिद्ध असलेला द्रविड 50 वर्षांचा झाला आहे. क्रीडा जगतातील दिग्गजांसह चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 1973 मध्ये इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडची स्वतःची एक वेगळी शैली आहे आणि तो त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण द्रविडलाही रागही येतो हे चाहत्यांना माहीत आहे का? ‘दीवार’ आणि ‘मिस्टर ट्रस्टवर्दी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला एकदा पाकिस्तान दौऱ्यावर प्रचंड राग आला होता. हा राग पत्रकार परिषदेदरम्यान आला, जेव्हा द्रविडने एका पत्रकाराला बाहेर काढण्यापर्यंत मजल मारली होती.
ही घटना 2004 मध्ये भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर घडली होती. त्यानंतर कसोटी मालिकेत द्रविडची बॅट जबरदस्त होती आणि त्याने 3 सामन्यांच्या 4 डावात 309 धावा केल्या. याच पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने मॅच फिक्सिंगबाबत प्रश्न केला होता.
मॅच फिक्सिंगच्या प्रश्नावर द्रविडला राग आला
यावर टीम इंडियाचा दीवार म्हटला जाणारा राहुल द्रविड चांगलाच संतापला. तेव्हा द्रविड जाहीरपणे म्हणाला, ‘या व्यक्तीला (रिपोर्टर) कोणीतरी बाहेर काढा. हा मूर्खपणा आहे आणि अशा गोष्टी खेळासाठी वाईट आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर दुसऱ्यांदा संतापला होता द्रविड
द्रविडला राग येण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. यानंतर 2006 मध्ये एकदा राहुल द्रविड चांगलाच चिडला होता. ही घटना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान घडली. त्या मालिकेत द्रविड संघाचा कर्णधार होता. यादरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवामुळे संतप्त झालेल्या द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये खुर्ची फेकली. खरे तर त्या विजयासह इंग्लंड संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. अशा स्थितीत द्रविडला पराभव सहन झाला नाही आणि तो संतापला.