Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये दरवर्षीच्या तुलनेत लवकरच हजेरी लावली आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी केला होता. अशातच आता हवामान खात्याने 3 जून 2025 रोजी राज्यातील हावमानाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागांमध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे. तसेच जून महिन्यातील पंधरवड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असून मान्सूनचा वेग मंदावणार आहे.
ADVERTISEMENT
पावसाची परिस्थिती लक्षात घेता, हवामान खात्याने प्रादेशिक हवामाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विभागांचा समावेश आहे.
हेही वाचा : अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली, आतून आला जोरदार आवाज अन्...
कोकण विभागातील पावसाचा अंदाज
कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश आहे. हवामान खात्याने कोकणभागात ढगाळ वातावरण निर्माण होणार असून 64.5 मिमीपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला. शक्यतो उशीरा किंवा पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका पाऊस
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. यापैकी पुणे आणि साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस थौमान घालणार आहे.
मराठवाड्यातील 'या' भागांत पावसाचा जोर
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये काही भागांमध्ये तुरळक तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
विदर्भातील मान्सून परिस्थिती
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातील हवामान हे ढगाळ राहणार असून हलक्या स्वरुपात विजांच्या कडकडाटांसह पाऊस हजेरी लावणार आहे. शेतीसाठी सावधगिरी बाळगावी असा सल्ला हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावात हलक्या स्वरुपाचा पाऊस असेल. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण असणार आहे. या पावसाचा प्रभाव हा शेतीवर होणार आहे. त्यासाठी पावसाने पेरणीपूर्व हवामान अंदाज तपासून घ्यावा.
पावसाची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
हवामान विभागाने या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नेमकी कोणती सावधगिरी बाळगावी याच्या काही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा : मोठा गेम झाला यार... लॉटरीचे 30 कोटी घेऊन गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत!
त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरी भागात सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आणि चाकरमान्यांनी नोकरीसाठी जाताना सावधानता बाळगावी.
ADVERTISEMENT
