Maharashtra weather alert : आभाळ फाटणार! मुंबई-पुण्यासह 6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

भागवत हिरेकर

• 03:31 PM • 20 Jul 2023

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

red alert in maharashtra tomorrow,

red alert in maharashtra tomorrow,

follow google news

Maharashtra, mumbai, pune, Raigad weather alert : गेल्या काही तासांपासून मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती उद्भवली असून, मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने विभागाने काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा आभाळ फुटल्याचीच स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

बंगालचा उपसागर आणि आडिशाच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने विभागनिहाय इशाराही दिला आहेत.

20 जुलै : मुंबई-पुण्यात अतिमुसळधार

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, पालघर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!

त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

21 जुलै : मुंबई, पुणे, रायगडमध्ये पावसाचा जोर कायम राहणार

हवामान विभागाने पालघर, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.

तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे.

इर्शाळवाडी दरड दुर्घटना : रेस्क्यू करताना मोठं आव्हान

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी या ठाकर आदिवासी समुदायाचं वास्तव्य असलेल्या गावावर दरड कोसळली. 19 जुलैच्या रात्री प्रचंड पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा कडा गावावर कोसळला.

वाचा >> Irshalwadiला पोहचलेल्या आदित्य ठाकरेंनी ‘असा’ दाखवला समजूतदारणा, म्हणाले…

20 जुलै रोजी दिवसभर या ठिकाणी बचाव व मदत कार्य सुरू होतं. एनडीआरएफ, एसडीआरएफसह विविध दलांच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. पण, प्रचंड पावसामुळे मदत कार्यात खूप अडथळे येत आहेत. त्यामुळे गुरूवारी (20 जुलै) रोजी सायंकाळी 5 वाजता अंधूक प्रकाश, पाऊस सुरू असल्याने दरड कोसळण्याच्या भीतीमुळे मदत कार्य थांबवण्यात आले.

21 जुलै रोजीही रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे इर्शाळवाडीतील मदत कार्यात शुक्रवारीही (21 जुलै) अनंत अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp