Praful Patel : "शरद पवार भाजपसोबत येण्यास 50 टक्के तयार झाले होते, पण..."

मुंबई तक

• 06:00 PM • 11 Apr 2024

Praful patel Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभाजनामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात पक्षाच्या निवडणूक चिन्हावर हक्क सांगण्यावरून वाद सुरू झाला होता.

शरद पवार आणि प्रफुल पटेल.

शरद पवार आणि प्रफुल पटेल.

follow google news

Sharad Pawar Praful Patel : गेल्या वर्षी जेव्हा अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा शरद पवारही सरकारसोबत जाण्यास '५० टक्के' तयार होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. गेल्या वर्षी २ जुलै रोजी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील 8 नेते भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये मंत्री झाले.

हे वाचलं का?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 'एनआयए'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, '2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि आमचे नेते महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 15 आणि 16 जुलै रोजी आम्ही शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचे आहे, असे आम्ही सांगितले. पुढे अजित आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. मला विश्वास आहे की शरद पवार 50 टक्के तयार होते."

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काय दिले उत्तर?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभाजनामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात पक्षाच्या निवडणूक चिन्हावर हक्क सांगण्यावरून वाद सुरू झाला होता. सरतेशेवटी, फेब्रुवारीमध्ये निकाल देताना निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केलं होतं.

हेही वाचा >> शरद पवारांना माढ्यात मिळाला उमेदवार, भाजपच्या विजयाचा मार्ग खडतर? 

निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' असे नवे नाव दिले होते. मात्र, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी प्रफुल्ल पटेल यांचे विधान निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

कशामुळे केली जात आहेत विधाने?

क्लाईड क्रॅस्टो म्हणाले, "प्रफुल्ल पटेल यांचे विधान निरर्थक असून त्याला किंमत नाही. या विधानात तथ्य नाही. ही सर्व विधाने केवळ त्यांची किंमत वाढवण्यासाठी केली जात आहेत, कारण भाजप अजित पवार गटाला ते काहीच नसल्यासारखी वागणूक देत आहे. गोष्टी घडायच्या असत्या तर त्या खूप आधी घडल्या असत्या."

हेही वाचा >> महाराष्ट्र भाजपला देणार आश्चर्याचा धक्का, नव्या ओपिनियन पोलचा कौल

शिंदे यांच्या बंडानंतर पडले सरकार 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, एनसीपीचे बहुतेक नेते 2022 मध्ये महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होऊ इच्छित होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडण्याची हीच वेळ होती."

    follow whatsapp