अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर PM मोदींनी पत्र लिहून व्यक्त केलं दु:ख

मुंबई तक

• 02:53 PM • 12 Sep 2021

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अक्षयने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली होती, त्यानंतर सेलेब्ससह चाहत्यांनीही त्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षय कुमारच्या आईच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त करणाऱ्या अभिनेत्यासाठी एक पत्र लिहिले आहे. अक्षय कुमारच्या आईच्या निधनाबद्दल पंतप्रधान […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अक्षयने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली होती, त्यानंतर सेलेब्ससह चाहत्यांनीही त्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अक्षय कुमारच्या आईच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त करणाऱ्या अभिनेत्यासाठी एक पत्र लिहिले आहे.

हे वाचलं का?

अक्षय कुमारच्या आईच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी दु: ख व्यक्त केले

अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेत्याला पत्र लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे. पीएम मोदींनी पत्रात लिहिले – “बरीच मेहनत आणि संघर्ष केल्यानंतर तुम्हाला यश मिळाले. तुम्ही मोठे नाव कमावले आणि तुमच्या समर्पणाने प्रसिद्धी मिळवली.” पंतप्रधानांनी पत्रात असेही म्हटले आहे की, अभिनेता म्हणून, अक्षयने मिळवलेले यश त्याच्या पालकांना नेहमीच अभिमानास्पद वाटेल.

अक्षयने पत्रासाठी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पीएम मोदींचे पत्र शेअर केले आणि त्याचे आभार मानले. अक्षयने लिहिले आहे की, ‘पीएम मोदींनी पत्रात सांगितलेल्या गोष्टी नेहमी माझ्यासोबत असतील. पत्र शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या शोक संदेशांबद्दल कृतज्ञता. मी आणि माझ्या दिवंगत पालकांबद्दल माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. हे सांत्वनदायक शब्द कायम माझ्यासोबत असतील.. जय अंबे, “

आईच्या निधनानंतर अक्षयने लिहिली होती ही पोस्ट

आईच्या निधनानंतर पोस्ट शेअर करताना अक्षय कुमारने लिहिलं होतं की, ‘ती माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग होती. आज मला असह्य वेदना जाणवत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज सकाळी या जगाचा निरोप घेतला आहे. ती दुसऱ्या जगात माझ्या वडिलांसोबत पुन्हा एकत्र आली आहे. मी तुमच्या प्रार्थनेचा आदर करतो पण सध्या मी एका कठीण काळातून जात आहे. ओम शांती.’

अक्षय कुमार शुटिंग अर्ध्यावर सोडून परतला होता

अक्षय कुमारच्या आईची तब्येत अनेक दिवसांपासून बरी नव्हती. शुक्रवारी अरुणा भाटिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूमध्ये दाखळ करण्यात आलं होतं. प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं शुटिंग अर्ध्यावरच सोडलं.

शुटिंग थांबवून अक्षय कुमार लंडनहून मुंबईत परतला होता. अक्षय कुमार लंडनमध्ये सिंड्रेला सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता.

    follow whatsapp