Ganesh Utsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला महत्त्वाचा संदेश, म्हणाले…

मुंबई तक

• 09:25 AM • 31 Aug 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या घरी पहिल्यांदाच गणेश उत्सव साजरा होतो आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनाचं संकट होतं त्यामुळे राज्यात गणेश उत्सव निर्बंधासह साजरे होत होते. मात्र पहिल्यांदाच निर्बंधाशिवाय गणेश उत्सव साजरा होतो आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे. Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी जुळून आला ‘हा’ […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या घरी पहिल्यांदाच गणेश उत्सव साजरा होतो आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनाचं संकट होतं त्यामुळे राज्यात गणेश उत्सव निर्बंधासह साजरे होत होते. मात्र पहिल्यांदाच निर्बंधाशिवाय गणेश उत्सव साजरा होतो आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे.

हे वाचलं का?

Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी जुळून आला ‘हा’ योग, अशी करा बाप्पाची पूजा

काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?

महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन घराघरात झालं आहे. दोन वर्षांपासून कायम असलेलं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. यंदाचा गणेश उत्सव निर्बंधमुक्त साजरा करूया. गणपती ही बुद्धिची देवता आहे. ही देवता आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान आणि आनंद घेऊन येवो. महाराष्ट्राच्या विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केलं.

Ganesh Chaturthi: रिंकू राजगुरूने दणक्यात केलं गणपत्ती बाप्पाचं स्वागत

आणखी काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी?

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करुयात आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करुयात, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गणपतीच्या आशीर्वादानं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण करत आहोत. गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुयात. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.

मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. सोबतच कोरोना आधी ज्या गणेशमुर्तींना मागणी होती, तीच मागणी यावर्षी देखील कायम आहे. घरगुती गणपतींसाठी बाल गणेशाच्या मूर्तींची मागणी यावर्षी वाढलेली दिसते. पीओपीपेक्षा मातीच्या मुर्तींना मागणी अधिक वाढलीय. एकूणच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसतोय.

    follow whatsapp