चेन्नई: तामिळनाडूमधून एक अत्यंत मोठी आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. सध्या तामिळनाडूमध्ये नवं सरकार स्थापन करणं हा अत्यंत विषय चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, अशातच आता जे 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलं तसंच काहीसं घडण्याच्या उंबराठ्यापर्यंत तामिळनाडूतील राजकारण पोहोचलं आहे. कारण आतापर्यंत कधीही जे घडलं नाही ते आता तिथे घडत असल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडूतील जनतेने थलपती विजय यांच्या पक्षाला 108 जागा दिलेल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत मात्र नाही. अशावेळी डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIDMK) यांसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्येच सत्तेसाठी आणि थलपती विजय यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रसारखीच नवी आघाडी तामिळनाडूत?
2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना (तेव्हाची अखंड) यांना बहुमताचा कौल मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आणि शिवसेनेने भाजपची साथ सोडत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना सोबत घेत आपलं स्वत:चं सरकार स्थापन केलं होतं. एकीकडे 105 जागांसह भाजप हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, शिवसेनेसह दोन्ही विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपला राज्यात सत्तेपासून तब्बल अडीच वर्ष दूर ठेवलं होतं.
हे ही वाचा>> 'ते' एक स्वप्न अन् 'या बड्या नेत्यांचा' राजकारणात गेम ओव्हर! असं नेमकं काय घडलं?
आता असाच काहीसा प्रकार तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतोय का? अशी जोरदार चर्चा तामिळनाडूमध्ये सुरू झाली आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार स्थापन करण्यासाठी डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षात बंद दाराआड जोरदार चर्चांची सत्रं सुरू आहेत. राजकारणात नवख्या असलेल्या विजय यांच्या पक्षाने दोन्ही जुन्या पक्षांना निवडणुकीत जबदरस्त दणका दिला. मात्र, असं असलं तरी बहुमताचा आकडा ही गोष्ट विजय यांच्यासाठी अद्याप तरी अडचणीची गोष्ट होऊन बसली आहे. यामुळे आता टीव्हीकेला रोखण्यासाठी दोन जुन्याजाणत्या पक्षांनी एका नव्या राजकारणाची सुरूवात करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दिसते आहे.
तामिळनाडूत राजकारणाला नवं वळण
दरम्यान, यापूर्वी टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी लोक भवनात राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. विजय यांनी 112 आमदारांची पाठिंब्याचं पत्रं देखील सादर केलं होतं. मात्र, राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी केल्याने विजय यांना अधिक वेळ मागून घेतला.
हे ही वाचा>> मोठी बातमी... ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत, आता पुढे काय?
दुसरीकडे, VCK ने डीएमकेसोबत युती करून निवडणूक लढवली होती. पण टीव्हीकेचे सरकार स्थापन करण्यासाठी VCK विजय यांच्यासोबत सामील होऊ शकते, अशी चर्चा होती. सत्तेत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यासाठी VCK ची काल बैठक होणार होती, पण आता डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या युतीच्या चर्चेमुळे VCK ने ही बैठक रद्द केली आहे. यापूर्वी, टीव्हीकेने निमंत्रण देऊनही, डाव्या पक्षांनी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने (IUML) पाठिंबा देण्यास नकार दिला होता.
हे लक्षात घ्यायला हवे की, तामिळनाडू निवडणुकीत 108 जागा जिंकून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण, त्यांना 118 हा बहुमताचा आकडा पार करता आला नाही. 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत टीव्हीकेकडे 108 जागा आहेत. विजय यांनी दोन जागा जिंकल्या आहेत आणि जर त्यांनी एक जागा रिक्त केली, तर हा आकडा 107 होईल.
यापूर्वी, विजय 7 मे रोजी शपथ घेतील असे वृत्त होते. त्यांना काँग्रेसचाही पाठिंबा आहे. पण, सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची गरज असल्याने आता हे सगळं प्रकरण अडकल्याचं दिसत आहे. परिणामी, शपथविधी सोहळा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











