मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व असं सत्तांतर झालं. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. माजी मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले. दोन वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या वेळी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई TAK’ ला खास मुलाखत दिली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई TAK’ शी बोलताना वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं. राज्य सरकारची दोन वर्ष, भाजपमधले फेरबदल, नवी जबाबदारी याबद्दल त्यांनी भाष्य केलं.
