जालना येथील अमानुष मारहाणीबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई तक

• 11:57 AM • 28 May 2021

जालना येथे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना अमानुष मारहाण झाली. यासंदर्भातला व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काय म्हटलं आहे देवेंद्र […]

Mumbaitak
follow google news

जालना येथे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना अमानुष मारहाण झाली. यासंदर्भातला व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ?

शिवराज नारियलवाले हे ९ तारखेला दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारांसाठी घेऊन गेले होते. त्यावेळी गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तिथे झाला आणि त्यामुळे काही लोक तिथे धुडगूस घालत होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काही पोलीस हे गवळी समाजाबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी तो प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. आपल्या समाजाबाबत कुणी आपत्तीजनक भाषेत काही बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणं एवढाच त्यांचा काय तो गुन्हा. पण त्यांना जी जबर शिक्षा पोलिसांनी दिली ते या व्हीडिओतून दिसून येतं आहे. गणवेशातील सहा आणि गणवेशात नसलेले दोन अशा आठ जणांनी त्यांना घेरून अमानुष मारहाण केली. अगदी डोक्यावरही मारण्यात आलं.

वस्तुतःरूग्णालयात धुडगूस घालणाऱ्या अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिवीगाळ कॅमेराबद्ध केली म्हणून संतापाच्या भरात कायद्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे त्यांनीच कायदा हाती घेतला हे दिसून येतं आहे. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश आहे. नारियलवाले यांचा दोष असेल तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई पोलिसांना करता आली असती. पण सराईत गुन्हेगाराला सुद्धा जशी मारहाण करत नाहीत तशी मारहाण नारियलवाले यांना करण्यात आली. या सगळ्या घटनेमुळे नारियलवाले आणि त्यांचं कुटुंब प्रचंड दहशतीत होतं. शिवीगाळ केल्याचा व्हीडिओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर डीवायएसपी एका लाच प्रकरणात सापडून निलंबित झाल्यानंतर कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्याने हा प्रकार उघडकीस आला अन्यथा हा प्रकारही कुणाला कळला नसता.

राज्यात कायद्याचे राज्यच नाही अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यावर सरकारचे मौन हे अधिक गंभीर आहे. खास करून राज्य सरकारविरोधात भाजपचे कार्यकर्ते किंवा कुणी सामान्य माणसानेही प्रतिक्रिया समाज माध्यमांवर दिली की अशा व्यक्तींना पोलिसांकडून मारहाण केली जाते आहे. हे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहे आपण या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी. अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

    follow whatsapp