पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार; राकेश टिकैत यांनी मांडली भूमिका

मुंबई तक

• 07:54 AM • 19 Nov 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली आहे. तसंच आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी आता घरी जावं असंही आवाहन मोदींनी केलं आहे. आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ही मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं असलं तरीही शेतकरी आंदोलन तातडीने […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली आहे. तसंच आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी आता घरी जावं असंही आवाहन मोदींनी केलं आहे. आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ही मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं असलं तरीही शेतकरी आंदोलन तातडीने मागे घेतलं जाणार नाही असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलं आहे. कृषी कायदे जोपर्यंत संसदेत रद्द होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. तसंच MSP आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने आमच्याशी चर्चा करावी.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी…

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं.

मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.

    follow whatsapp