सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा; आमदार दीपक केसरकर यांची मागणी

मुंबई तक

• 02:38 PM • 27 Jun 2022

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला हवा कारण सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही मागणी केली आहे. जर तुमच्यासोबतचे ५१ आमदार गुवाहाटीला आले आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसून कसे राहू शकता? तुमचं सरकार अल्पमतात आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेत असं आधी कधी घडलेलं नाही. ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ […]

Mumbaitak
follow google news

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला हवा कारण सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही मागणी केली आहे. जर तुमच्यासोबतचे ५१ आमदार गुवाहाटीला आले आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसून कसे राहू शकता? तुमचं सरकार अल्पमतात आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेत असं आधी कधी घडलेलं नाही.

हे वाचलं का?

ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदे गटाची
सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी

विधान परिषद निकालाच्या बरोबर एक दिवस नंतर म्हणजेच २१ जून ला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. या बंडामुळे राज्यात आणि महाविकास आघाडीत प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंसमोर सरकार वाचवण्यासोबतच शिवसेना हा पक्षही वाचवण्याचं आव्हान आहे कारण एकनाथ शिंदे गट हा आम्हीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असं म्हणत बाहेर पडला आहे. तसंच हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना विरूद्ध शिवसेना असाच सामना पाहण्यास मिळतो आहे. अशात आता दीपक केसरकर यांनी आज तकसोबत चर्चा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा ‘रात्रीस राजकीय खेळ’?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?

सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेणारं पत्र ५१ आमदारांच्या सह्या घेऊन राज्यपालांना पाठवण्याची तयारी केली आहे असं समजतं आहे. एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेच्या ३९ तर अपक्ष १२ अशा एकूण ५१ आमदारांचं बळ आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं पत्र पाठवलं आणि ते जर राज्यपालांनी स्वीकरालं तर बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल सरकारला सांगू शकतात. यानंतर फ्लोअर टेस्ट झाली तर अविश्वास ठरावाला उद्धव ठाकरेंना सामोरं जावं लागू शकतं.

दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे?

यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान व्हा म्हणून राष्ट्रपतींनी आमंत्रण दिलं होतं मात्र त्यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी नकार दिला. जर ५१ आमदार अल्पमतात गुवाहाटीला निघून आले असतील तर त्याचाच अर्थ हे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे त्यांनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही बातमी समोर येत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ जून अशा दोन्ही दिवशी राजीनामा देण्याच्या तयारी होते असं समजतं आहे. मात्र शरद पवारांनी त्यांना थांबवलं त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही असंही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळतं आहे.

    follow whatsapp