थेट सरपंचपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 1,166 ग्रामपंचायतीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:34 PM • 07 Sep 2022

follow google news

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

हे वाचलं का?

संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणूक आयुक्त मदान म्हणाले, ‘संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.’

ग्रामपंचायत निवडणूक २०२२ : असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येणार आहे. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची छाननी २८ सप्टेंबर केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होणार असून, मतदान १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे.

नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होणार असून, समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा आरक्षित केल्या जाणार आहेत.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या

ठाणे जिल्हा : कल्याण- ७, अंबरनाथ – १, ठाणे – ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९. पालघर जिल्हा : डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०.

रायगड जिल्हा : अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १. रत्नागिरी जिल्हा : मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३, रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०.

सिंधुदुर्ग जिल्हा : दोडामार्ग- २ व देवडगड- २. नाशिक जिल्हा : इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१ त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१

नंदुरबार जिल्हा : अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१.

पुणे जिल्हा : मुळशी- १ व मावळ- १. सातारा जिल्हा : जावळी- ५, पाटण- ५ व महाबळेश्वर- ६. कोल्हापूर जिल्हा : भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा- १ व चंदगड- १.

अमरावती जिल्हा : चिखलदरा- १. वाशीम जिल्हा : वाशीम- १. नागपूर जिल्हा : रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही- ८. वर्धा जिल्हा : वर्धा- २ व आर्वी- ७. चंद्रपूर जिल्हा : भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १.

भंडारा जिल्हा : तुमसर- १, भंडारा- १६, पवणी- २ व साकोली- १. गोंदिया जिल्हा : देवरी- १, गोरेगाव- १ गोंदिया- १, सडक अर्जुनी- १ व अर्जुनी मोर- २. गडचिरोली जिल्हा : चामोर्शी- २, आहेरी- २, धानोरा- ६, भामरागड- ४, देसाईगंज- २, आरमोरी-२, एटापल्ली- २ व गडचिरोली- १.

    follow whatsapp