महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 67 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 410 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 63 लाख 24 हजार 720 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.8 टक्के इतके झाले आहेत. आज राज्यात दिवसभरात 3586 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:23 PM • 17 Sep 2021

follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 410 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 63 लाख 24 हजार 720 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.8 टक्के इतके झाले आहेत. आज राज्यात दिवसभरात 3586 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 67 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 67 लाख 9 हजार 128 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 15 हजार 111 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 81 हजार 72 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1813 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 48 हजार 451 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3586 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,15,111 इतकी झाली आहे.

Pm Narendra Modi यांच्या वाढदिवशी देशभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्ण

मुंबई- 5502

ठाणे-7240

पुणे-13432

सातारा-3616

सांगली-2468

सोलापूर-2397

अहमदनगर-6607

मुंबईत 434 नवे रूग्ण

मुंबईत 434 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 387 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 13 हजार 992 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर राज्यात आज घडीला 4658 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1289 दिवसांवर गेला आहे.

वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकाने कोरोनाच्या तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट जास्त घातक नसेल, असं प्रा. ज्ञानेश्वर चौबे यांनी म्हटलं आहे.

तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते?

प्रा. चौबे यांनी यांच्या अंदाजाप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट कमीत कमी तीन महिन्यानंतर येऊ शकते. तिसऱ्या लाटेला रोखण्यात लसीकरण मोहीम फायदेशीर ठरेल. कारण लस घेतलेल्या नागरिकांना आणि कोरोनातून बऱ्या झालेले लोक म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्रुपमध्ये येणारे लोक सुरक्षित राहतील, असं चौबे यांनी म्हटलं आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही लहान मुलं सुरक्षित असतील, असं चौबे यांचं म्हणणं आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही लहान मुलं सुरक्षित असतील, असं चौबे यांचं म्हणणं आहे.