एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर... 'माझा मोठा भाऊ हरपला, आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय, अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे'

Eknath Shinde on Ajit Pawar Death : एकनाथ शिंदे म्हणाले, मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावणारी अतिशय दुर्देवी घटना आज महाराष्ट्रात घडली. कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून निघून जातील.  महाराष्ट्रासाठी अतिशय दु:खद घटना आहे.

Eknath Shinde on Ajit Pawar

Eknath Shinde on Ajit Pawar

मुंबई तक

28 Jan 2026 (अपडेटेड: 28 Jan 2026, 12:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माझा मोठा भाऊ हरपला, आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय

point

अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे; एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर

Eknath Shinde on Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीये. अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या असून त्यांची विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे म्हणाले, मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावणारी अतिशय दुर्देवी घटना आज महाराष्ट्रात घडली. कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून निघून जातील.  महाराष्ट्रासाठी अतिशय दु:खद घटना आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड आणि स्पष्टवक्तेपणा असलेले ते होते. बारीक अभ्यास करुन ते बोलायचे. रोखठोक बोलणारे असले तरी मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वत: घेतलेला आहे. 

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अजितदादांनी सकाळी सहा वाजताच्या अपॉईंटमेंट दिलेल्या अधिकारी आणि लोकप्रतीनिधींनी पाहिलेल्या आहेत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलाय. काल पर्वाच आमची कार्यक्रमात भेट झाली होती. सरन्यायाधीश मुंबईत आले होते. ते येण्यापूर्वी आम्ही एका चेंबरमध्ये बसलो होतो. आमच्यापेक्षा अनुभवी नेते होते, वयाने देखील मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालंय. मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना मनात दु:खाच्या भावना आहेत.  शेवटी आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय. 6 लोकं मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे. आणि चौकशी नक्कीच होईल.. या पुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये. यासाठी ते गरजेचं आहे. त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रिनोवेशनचे काम सुरु असताना पाऊस आला, मजूर पडीक खोलीत आश्रयाला गेले, अन् दोन वर्ष सडलेला मृतदेह आढळला

    follow whatsapp