शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…

मुंबई तक

02 May 2023 (अपडेटेड: 02 May 2023, 04:18 PM)

Sushma andhare wrote emotinal letter for sharad pawar :ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे.या पोस्टमध्ये त्या काय म्हणाल्या आहेत? हे जाणून घेऊयात.

Sushma andhare wrote emotinal letter for sharad pawar

Sushma andhare wrote emotinal letter for sharad pawar

follow google news

Sushma andhare wrote emotinal letter for sharad pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्र्सेच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता या घोषणेवर शरद पवार दोन ते तीन दिवसात पुर्नविचार करून भाष्य करतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली. शरद पवार यांच्या या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. त्यात आता ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे.या पोस्टमध्ये त्या काय म्हणाल्या आहेत? हे जाणून घेऊयात. (Sushma andhare wrote emotinal letter for sharad pawar political retirement)

हे वाचलं का?

सुषमा अंधारे यांचे संपूर्ण पत्र…

आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब
अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

सर नमस्ते, खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणूनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही.

सर, बदल हा सृष्टीचा नियम असतो, जे काल होते, ते आज असेलच असे नाही, जे आज आहे ते उद्या राहीलच असे नाही, पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबात मान्य नसतो, महाराष्ट्रातील बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

सर. आपल्यानंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खुप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील. पण सर, माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल,मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलाम माने असतील, ही माणसं आपण उभी केलीत. कुणीही काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवर अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला. शेतीच्या सातबारावर घरातल्या पुरुषाइतकेच माय माऊलीचे सुद्धा नाव असले पाहिजे हा क्रांतिकारी निर्णय़ सुद्धा आपल्याच काळातला !

कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसुत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य, आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे. हे सत्य महाराष्ट्रात काय भारतात कोणालाही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही.

पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे. एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे आशिर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे,असे सुषमा अंधारे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

 

    follow whatsapp