'आम्ही घरात घुसून मारू, जिवंत सोडणार नाहीत...', PM मोदींच्या 'या' विधानाचा अर्थ काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जाऊन तेथील हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा सज्जड दम भरला.

PM मोदींच्या 'या' विधानाचा अर्थ काय?

PM मोदींच्या 'या' विधानाचा अर्थ काय?

मुंबई तक

• 06:52 PM • 13 May 2025

follow google news

आदमपूर (पंजाब): पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (13 मे) सकाळी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. ज्याचे काही फोटो समोर येताच पाकिस्तानचा प्रचार एका झटक्यात उद्ध्वस्त झाला. या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी भारतीय हवाई दलाच्या सैनिकांकडे हात हलवताना दिसत आहेत, तर त्यांच्या मागे मिग-29 जेट आणि एस-400 हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे सुरक्षित उभी आहे. या फोटोचा संदेश दुहेरी होता - त्याने पाकिस्तानच्या JF-17 लढाऊ विमानांमधून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनी आदमपूरमधील S-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केवळ खोडून काढला नाही तर पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षेप्रती अढळ वचनबद्धतेचे संकेतही दिले.

हे वाचलं का?

ते म्हणाले की, 'भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिली आहे. आम्ही घरात घुसून तुमच्यावर हल्ला करू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही.' असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला थेट आणि स्पष्टपणे इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाराचा पाकिस्तानला देखील गर्भित अर्थ नेमका समजला असेलच.

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या हवाई योद्ध्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केले आहे.' भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिले आहे की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे दहशतवादी शांततेत बसू शकतील. आम्ही घरात घुसून तुमच्यावर हल्ला करू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही.'

आमच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची झोप उडवली आहे: पंतप्रधान मोदी

मोदींनी भारताच्या आधुनिक लष्करी क्षमतेचे कौतुक केले आणि पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, 'आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्रे - त्यांच्याबद्दल फक्त विचार केला तरी पाकिस्तानची अनेक दिवस झोप उडेल. वाईटाचा नाश करण्यासाठी आणि नीतिमत्ता स्थापित करण्यासाठी शस्त्रे उचलण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचे सिंदूर हिसकावून घेतले गेले, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना नेस्तनाबूत केलं. ते भित्र्यासारखे लपून आले होते, पण ते विसरले की त्यांनी ज्याला आव्हान दिले होते ते भारतीय सैन्य होते.' 

'तुम्ही दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले. 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवादाच्या सूत्रधारांना आता हे समजले आहे की, भारताकडे डोळे वर करून पाहिलं तर एकच परिणाम होईल - विनाश. भारतात निष्पाप लोकांचे रक्त सांडण्याचा एकच परिणाम होईल - विनाश आणि सामूहिक विनाश.'

ऑपरेशन सिंदूरने देशाला एकतेच्या धाग्यात बांधले आहे: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलाच्या सैनिकांना सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तुम्ही देशाचे मनोबल वाढवले आहे, देशाला एकतेच्या धाग्यात बांधले आहे आणि भारताच्या सीमांचे रक्षण केले आहे. तुम्ही भारताच्या स्वाभिमानाला नवीन उंची दिली आहे. तुम्ही असे काहीतरी केले आहे जे अभूतपूर्व, अकल्पनीय, आश्चर्यकारक आहे.' 

'तुमच्या शौर्यामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज कानाकोपऱ्यात ऐकू येत आहे. या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत उभा राहिला. प्रत्येक भारतीयाच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आभारी आणि ऋणी आहे.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

    follow whatsapp