एकाच वर्षात भारतीय संघाला मिळाले 7 कर्णधार, शिखर धवन मैदानात उतरताच रचणार विश्वविक्रम

मुंबई तक

• 04:21 PM • 21 Jul 2022

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये इथे तीन एकदिवसीय आणि त्यानंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (22 जुलै) होणार आहे. शिखर धवन कर्णधार होताच इतिहास रचणार आहे. वास्तविक, या वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा धवन हा 7वा कर्णधार असणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघ एका वर्षात […]

Mumbaitak
follow google news

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये इथे तीन एकदिवसीय आणि त्यानंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (22 जुलै) होणार आहे. शिखर धवन कर्णधार होताच इतिहास रचणार आहे. वास्तविक, या वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा धवन हा 7वा कर्णधार असणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघ एका वर्षात सर्वाधिक कर्णधार करणारा श्रीलंका संघाच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे.

हे वाचलं का?

हे वर्ष संपायला अजून 5 महिने बाकी आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाला 8 वा कर्णधार मिळाला तर श्रीलंका संघाचा विश्वविक्रम मोडीत निघेल. क्रिकेट इतिहासात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 7 कर्णधार करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे, जो त्यांनी 2017 मध्ये केला होता. याशिवाय झिम्बाब्वे, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी क्रिकेट इतिहासात एका वर्षात आतापर्यंत 6-6 कर्णधारांचा वापर केला आहे.

एका वर्षात सर्वाधिक कर्णधार करणारे संघ

2022 भारत – 7*

2017 श्रीलंका – 7

2001 झिम्बाब्वे – 6

2011 इंग्लंड – 6

2021 ऑस्ट्रेलिया – 6

टीम इंडियाचा कर्णधार कसे बदलले…

वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या कसोटीत कोहली कर्णधार होता आणि मालिका गमावल्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले.

आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने वनडे मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. नंतर टीम इंडियाला आयर्लंडच्या दौऱ्यावर जावे लागले. रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले. हार्दिक या वर्षाचा पाचवा कर्णधार होता.

त्यानंतर, इंग्लंड दौऱ्यावर एजबॅस्टन कसोटीपूर्वी रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यानंतर जसप्रीत बुमराहकडे कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली. बुमराह कसोटीत उपकर्णधार होता, त्यामुळे त्याला ही जबाबदारी मिळाली.

आता शिखर धवनला वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. धवन हा या वर्षातील 7 वा कर्णधार असेल. मात्र, याआधीही धवनने कर्णधारपद भूषवले आहे. गेल्या वर्षीच्या श्रीलंका दौऱ्यात धवननेच कर्णधारपद भूषवले होते.

    follow whatsapp