PBKS vs MI: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 5 विकेट्सने पराभव केला. 1 जून (रविवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबला जिंकण्यासाठी 204 धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि हे लक्ष्य त्यांनी 6 चेंडू शिल्लक असतानाच गाठले.
ADVERTISEMENT
RCB सोबत रंगणार अंतिम सामना
MI सोबतच्या सामन्यात विजय मिळवून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा त्यांचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यासोबत होणार आहे. मात्र या सामन्यातील पराभवामुळे सहाव्यांदा विजेतेपद जिंकण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगले. अंतिम सामना 3 जून रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने क्वालिफायर 2 सामना गमावल्यानंतर आपले दुःख व्यक्त केले. हार्दिक पंड्याने श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय दिले. या सामन्यात श्रेयसने नाबाद 87 धावा केल्या आणि सामना पूर्णपणे मुंबई इंडियन्सच्या आवाक्याबाहेर नेला. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी टीमच्या गोलंदाजांना जबाबदार ठरवले.
या सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, "श्रेयस अय्यरने खूप चांगली फलंदाजी केली, त्याने संधी मिळवल्या. त्याचे काही शॉट्स खरोखरच अद्भुत होते. याचे पूर्ण श्रेय त्यांच्या फलंदाजीच्या युनिटला जाते. त्याने उत्तम फलंदाजी केली. आम्हाला विशेषत: या मोठ्या समान्यात चांगल्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्सची गरज होती."
हे ही वाचा: मोठा गेम झाला यार... लॉटरीचे 30 कोटी घेऊन गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत!
संघाच्या पराभवावर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, "आम्हाला आमचं प्लॅनिंग हवं तसं आमलात आणता आलं नाही. खरंतर हे पीचबद्दल नाही तर. हे योग्य लेंथवर गोलंदाजी करण्याबद्दल आणि योग्य वेळी योग्य गोलंदाज आणण्याबद्दल होतं. जर आम्ही गोलंदाजीच्या दृष्टीने चांगलं खेळलो असतो तर कदाचित निकाल वेगळा असता. आम्हाला नेहमीच असे वाटते की 18 चेंडू शिल्लक असले तरी जस्सी (बुमराह) काहीतरी खास करू शकतो. मात्र, या सामन्यात ते घडले नाही."
'मला नेहमी मोठी आव्हानं स्वीकारायला आवडतात'- श्रेयस
या सामन्यातील विजेत्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, "मला अशी मोठी आव्हानं आवडतात. मी नेहमी स्वतःला आणि माझ्या टीममधील सदस्यांना सांगतो की मोठ्या सामन्याच्या वेळी जितके तुम्ही शांत असाल तितके चांगले परिणाम पाहायला मिळतील. आजच्या सामन्यात मी घाम गाळण्याव्यतिरिक्त माझ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करत होतो."
हे ही वाचा: आईचे परपुरूषासोबत लिव्ह-इन संबंध, मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले!
सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, "मी सामन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, सर्व खेळाडूंनी पहिल्याच चेंडूपासूनच प्रयत्न सुरू ठेवला. दुसऱ्या टोकाचे फलंदाज खूप चांगली फलंदाजी करत होते. मी जितका जास्त वेळ मैदानावर घालवीन तितका मी चांगला होत जाईन, हे मला माहित आहे. पहिल्या सामन्यापासूनच सकारात्मकता आवश्यक होती. त्यामुळे एक सामना (RCB विरुद्धचा पराभव) आम्हाला एक संघ म्हणून परिभाषित करू शकत नाही."
ADVERTISEMENT
