IPL 2023 : आरसीबी आयपीएलमधून बाहेर… विराट कोहलीने अखेर सोडलं मौन

मुंबई तक

23 May 2023 (अपडेटेड: 23 May 2023, 12:57 PM)

गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर आरसीबीचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे.

RCB out from ipl 2023 virat kohli shares hearfelt post

RCB out from ipl 2023 virat kohli shares hearfelt post

follow google news

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडला. अटीतटीच्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंसह चाहत्यांमध्ये काहीसं निराशेचं वातावरण निर्माण झालं होतं. संघाच्या पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहलीनेही बोलणं टाळलं होतं. अखेर कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. बंगळुरूचा संघ आयपीएलचा सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता आणि यावेळी हा संघ विजेतेपदावर कब्जा करू शकेल, असे मानले जात होते. पण तसे होऊ शकले नाही आणि आरसीबीच्या चाहत्यांचे स्वप्न भंगले. कोहली अँड कंपनीसाठी आतापर्यंत 16 हंगाम झाले आहेत, यात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

हे वाचलं का?

गुजरात टायटन्स संघाने अंतिम साखळी सामन्यात बंगळुरूचा पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. यावर विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पराभवानंतर विराटने आरसीबीच्या संघाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?

विराट कोहलीने 23 मे रोजी शेअर केलेल्या आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, या हंगामात असे काही क्षण होते जे कधीच विसरता येणार नाहीत, परंतु आम्ही आमच्या ध्येयापूर्वी थोडे चुकलो. निराश नक्कीच झालो आहोत परंतु आपली उंच ठेवली पाहिजे.

आरसीबीच्या सर्व निष्ठावंत समर्थकांचा मी ऋणी आहे. मी माझा संघ, प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानू इच्छितो. पुढच्या वेळी आणखी मजबूतीने येण्याचे आमचे ध्येय आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

हेही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार

अखेरच्या सामन्यात काय घडलं होतं?

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. संघाकडून विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीमुळे आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 1978 धावा केल्या. मात्र, शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण केल्यामुळे कोहलीच्या शतकावर पाणी फेरले गेले. गिलने 52 चेंडूत 104 धावा ठोकल्या आणि आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायमच्या संपल्या.

हा हंगाम कोहलीसाठी राहिला खास

आरसीबीचा पराभव होताच मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. संघाने अंतिम साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र, आरसीबीच्या पराभवानंतरही विराट कोहलीसाठी हा मोसम चांगलाच ठरला. IPL 2023 मध्ये विराटने अनेक विक्रम मोडले. या कोहलीने 14 सामन्यात 639 धावा केल्या. या सत्रात त्याची सरासरी 53.25 इतकी होती.

    follow whatsapp