चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस! ट्रक आणि प्रवासी गाडी पुरात गेली वाहून

मुंबई तक

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील घटनांत वाहनांबरोबरच सात ते आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातही जोरदार पाऊस झाला असून, चार गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा जिल्ह्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला असून, दोन जण पुरात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील घटनांत वाहनांबरोबरच सात ते आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातही जोरदार पाऊस झाला असून, चार गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा जिल्ह्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला असून, दोन जण पुरात वाहून गेले आहेत. वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

चंद्रपुरात टाटा मॅजिक गेली वाहून

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात प्रवासी असलेली गाडी वाहून गेली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी गेली वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला पूर आलेला असतानाही चालकानं दाखवलं धाडस सगळ्यांच्याच अंगलट आलं. गाडीत ५ प्रवाशी आहेत. पाण्याच्या प्रवाहात ओढली जातात प्रवाशी टपावर चढले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य हाती घेतलं. जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

गडचिरोलीत ट्रकच सापडला पुराच्या तडाख्या

हे वाचलं का?

    follow whatsapp