‘BMC च्या सत्तेसाठी उद्धव ठाकरेंकडून धार्मिक तुष्टीकरण’, ‘जागर मुंबईचा’मध्ये शेलारांचा गंभीर आरोप
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालीये. राजकीय मोर्चबांधणी जोरात सुरू असतानाच भाजपनं जागर मुंबईचा अभियानाचं आयोजन केलंय. पहिल्याच कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत?’, असा थेट सवाल जागर आशिष शेलार यांनी […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालीये. राजकीय मोर्चबांधणी जोरात सुरू असतानाच भाजपनं जागर मुंबईचा अभियानाचं आयोजन केलंय. पहिल्याच कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत?’, असा थेट सवाल जागर आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय.
वांद्रे येथील सरकारी वसाहतीमध्ये मुंबई भाजपाच्या जागर मुंबईचा या अभियानातंर्गत पहिली सभा झाली. या सभेतून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर धार्मिक तुष्टीकरण करत असल्याचा आरोप केला. आशिष शेलार म्हणाले, ‘राज्यात अडीच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची सत्ता बळकाविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत धार्मिक तुष्टीकरण करण्याला सुरुवात केली आहे. पण, आम्ही ठामपणे सांगतो उद्धवजींना ना मराठी, ना मुस्लिम मते देणार नाहीत. सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत?”
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, “एकही विकासकाम केल्याचं सांगता येत नाही म्हणून मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळण्याची सुरुवात करण्यात येत आहे. उद्धवजी, तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे?”, प्रश्न आशिष शेलार यांनी सभेतून केला.
“आमच्या कोकणातील मराठी मुस्लिम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सर्वांसोबत सण उत्सवात सुख दु:खात मिळून मिसळून राहतात मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय?”, असंही शेलार उद्धव ठाकरेंना म्हणाले.