महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा आज करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली. आगामी निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

एकनाथ शिंदे आणि पक्षातील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या घडामोडीनंतर आज संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली.

मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे हे उपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे म्हणाले, ‘संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भारताचं संविधान आणि लोकशाही ही मानवी मूल्ये घेऊन महाराष्ट्रात काम करत आहे.”

“आम्ही २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडचं राजकीय पक्षामध्ये रुपांतर केलं आहे. महाराष्ट्रातील आजचं वातावरण… गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका मांडली. जे निर्णय घेतले. फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार त्यांनी आक्रमकपणे मांडला. संघप्रणित विषमतावादी विचारधारा आहे. तिला सर्वशक्तीशी विरोध केला. लोकांच्या बाजूने राहिले. आता लोकशाही धोक्यात आहे. छोटे पक्ष, सामाजिक संघटना, विचारधारा अस्तित्वा ठेवायची असेल, तर हे समीकरण जुळवावं लागेल, यावर आमचं एकमत झालं.”

ADVERTISEMENT

“एक वैचारिक जनआंदोलन महाराष्ट्रात उभं राहिल. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आणि भारताचं संविधान यांना मानणारा नवसमाज व लोकांचे हक्क अधिकार मिळावेत आणि भारतीय लोकशाही घराघरात जावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं बनबरे म्हणाले.

ADVERTISEMENT

‘शिवसेना-संभाजी ब्रिगेड सर्व निवडणुका एकत्र लढवेल’

“महाराष्ट्राचं हित साधण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीचा निर्णय घेतला आहे. देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण झाली आहे. संविधान धोक्यात आलं आहे. त्याला सुरक्षित करायचं असेल, संरक्षण द्यायचं असेल, तर पुरोगामी संघटनांनी एकत्र यायला हवं. भविष्य काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सर्व निवडणुकात शिवसेनेसोबत असू”, असं संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे म्हणाले.

संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले?

‘शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड दोन्ही लढवय्या संघटना आहेत. आज महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता चिरडवून टाकणं, प्रादेशिक पक्ष संपवणं यालाच लोकशाही मानणारे काही लोक बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत’, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे. आमचा न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, पण हा जो निकाल लागणार आहे तो केवळ शिवसेनेच्या भविष्याचाच असेल असं नाही, तर देशात लोकशाही राहिल की, बेबंदशाही राहिल हे ठरवणारा तो निकाल असेल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT