कोकण, रायगड, रत्नागिरीत पाऊस घालणार धुमाकूळ! या भागात यलो अलर्ट; कसं आहे राज्यातील आजचं हवामान?
maharashtra weather Update : मान्सूनने राज्यात मागील मे महिन्याअखेरीस धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर राज्यात 9 जून पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर 9 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मान्सूनने राज्यात मागील महिन्याअखेरीस धुमाकूळ घातला

9 जूनपर्यंत 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी
maharashtra weather Update : मान्सूनने राज्यात मागील मे महिन्याअखेरीस धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर राज्यात 9 जून पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर 9 जूनपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालणार आहे.
हेही वाचा : ईदच्या दिवशी बकरी नव्हे, स्वत:च्याच मानेवरून फिरवला चाकू..यामागचं कारण वाचून हादरूनच जाल!
कोकणासह मुंबईतील मान्सूनची स्थिती
कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. तर मुंबईत ढगाळ वातावरण असून काही अंशी उकाडा जाणवेल. मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सातारा आणि पुण्यात पावसाचा जोर
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर आणि नाशकात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे. सातारा आणि पुणे येथे पावसाचा अधिक जोर असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शेतकरी आणि स्थानिकांनी सतर्क रहावं
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणीत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस हजेरी लावेल. तर ढगाळ वातावरण असून काही अंशी प्रमाणात उकाडा जाणवेल. दरम्यान, पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'या' भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस
तर विदर्भातील नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. या ठिकाणीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुलांचे भांडणं सोडवायला गेलेल्या आईलाच संपवलं, पाणी भरताना काय घडलं?
येलो अलर्टमुळे शेतकरी, मासेमारी करणाऱ्यांना आणि स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. विशेषत: कोकण आणि घाटात वारे वाहून पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकेल. शेतीसाठी 12 जूननंतर मान्सून दाखल होणार असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी.