Manoj Jarange : 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, रायगडाच्या पायथ्यावरून जरांगेंची गर्जना
सरकारने अध्यादेश काढला असला तरी त्यांची जोपर्यंत अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी पुन्हा मी 10 फेब्रुवारी पासून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी रायगडाच्या (Raigad) पायथ्यावरून पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या मागणीबरोबरच महाराष्ट्रातील दाखल झालेले गुन्हे 10 फ्रेब्रुवारीच्या आत मागे घ्या अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रायगडावरून घोषणा करताना त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह उद्यापासूनच अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
केंद्रात जाण्याचीही भाषा
सरकारकडून एकीकडे शब्द दिला जातो आहे तर दुसरीकडे केंद्रात जाण्याचीही भाषा केली जाते आहे. त्यामुळे आम्ही आता आणखी दहा दिवसांची मुदत सरकारला देत असून त्यांनी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी असंही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.
हे ही वाचा >> आधी मुख्यमंत्र्याचा फोन टाळला, आता वडेट्टिवारांच्या भेटीला, किरण सामंतांचं नेमकं चाललंय काय?
प्रमाणपत्रासाठी अर्ज करा
मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सहा घोषणा केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, सरकारला आताही आम्ही वेळ देत असून सरकारकडून शब्द फिरवला जात आहे. त्यामुळे मराठ्यांनीही ज्यांना नोंदी सापडल्या आहेत. त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.